शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
2
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
3
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
5
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
6
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
7
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
8
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
9
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
10
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
11
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
12
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
13
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
14
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
15
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
16
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
17
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
18
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
19
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
20
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर

७४ कोटी रूपयातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:54 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे करण्यासाठी १२७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ७४ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.

ठळक मुद्दे४,५१९ कामांना मंजुरी : जलयुक्त शिवार अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे करण्यासाठी १२७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ७४ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्ह्यातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मात्र सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने सदर व्यवसाय तोट्याचा ठरत चालला आहे. धानाच्या शेतीसाठी अगदी सुरूवातीपासून सिंचनाची गरज असते मात्र मोठे सिंचन प्रकल्प नाहीत. तलाव, बोड्यांच्या माध्यमातून सिंचन केले जाते. मात्र दिवसेंदिवस या साधनांची पाणी साठवण क्षमता कमी होत चालली आहे. त्यांचे खोलीकरण करणे गरजेचे झाले आहे. तलाव, बोड्यांचे खोलीकरण झाल्यास सिंचनाची सुविधा उपलब्ध होते तसेच भूजल पातळीतही वाढ होण्यास मदत होते. या दोन्ही उद्देशानेच शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा उपक्रम सुरू केला आहे.जलयुक्त शिवार अभियानची कामे विविध विभागांच्या मार्फतीने केली जातात. यामध्ये प्रामुख्याने कृषी विभाग, पंचायत समिती, लघुसिंचन विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, वनविभाग आदींचा समावेश आहे. या सर्व विभागांना निधी उपलब्ध करून देऊन काम पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने जलयुक्त शिवारची कामे करण्यास मोठा वाव आहे.मुख्यमंत्र्यांनीही गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कामे प्रगतीपथावर आहेत. २०१८-१९ या वर्षात जलयुक्त शिवारच्या कामांवर सुमारे ७४ कोटी ४२ लाख रूपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. या निधीतून सुमारे ४ हजार ५१९ कामे केली जाणार आहेत. कृषी विभागाने २ हजार २२८ कामे मंजूर केली आहेत. या कामांसाठी २४ कोटी रूपये खर्च येणार आहे. पंचायत समिती विभागाने २५० कामे मंजूर केली आहेत. त्यावर तीन कोटी रूपये खर्च येणार आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने ७२ कामे मंजूर केली आहेत. त्यावर ११ कोटी ५७ लाख रूपये खर्च होणार आहेत. जलसंधारण विभागाने ४२ कामे मंजूर केली. त्यावर ८ कोटी ७३ लाख रूपये खर्च होणार आहेत. जलसंपदा विभागाने केवळ ३ कामे मंजूर केली. त्यावर ८२ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. वनविभागाने १ हजार ९२४ कामे मंजूर केली आहेत. त्यावर ४५ कोटी १९ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.कामे पूर्ण कराशासनाकडून निधी प्राप्त होतो. मात्र सदर निधी खर्च केला जात नाही. ही गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य अडचण आहे. कामे सुरू करून ती पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार