शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

७४ कोटी रूपयातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:54 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे करण्यासाठी १२७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ७४ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.

ठळक मुद्दे४,५१९ कामांना मंजुरी : जलयुक्त शिवार अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे करण्यासाठी १२७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ७४ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्ह्यातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मात्र सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने सदर व्यवसाय तोट्याचा ठरत चालला आहे. धानाच्या शेतीसाठी अगदी सुरूवातीपासून सिंचनाची गरज असते मात्र मोठे सिंचन प्रकल्प नाहीत. तलाव, बोड्यांच्या माध्यमातून सिंचन केले जाते. मात्र दिवसेंदिवस या साधनांची पाणी साठवण क्षमता कमी होत चालली आहे. त्यांचे खोलीकरण करणे गरजेचे झाले आहे. तलाव, बोड्यांचे खोलीकरण झाल्यास सिंचनाची सुविधा उपलब्ध होते तसेच भूजल पातळीतही वाढ होण्यास मदत होते. या दोन्ही उद्देशानेच शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा उपक्रम सुरू केला आहे.जलयुक्त शिवार अभियानची कामे विविध विभागांच्या मार्फतीने केली जातात. यामध्ये प्रामुख्याने कृषी विभाग, पंचायत समिती, लघुसिंचन विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, वनविभाग आदींचा समावेश आहे. या सर्व विभागांना निधी उपलब्ध करून देऊन काम पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने जलयुक्त शिवारची कामे करण्यास मोठा वाव आहे.मुख्यमंत्र्यांनीही गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कामे प्रगतीपथावर आहेत. २०१८-१९ या वर्षात जलयुक्त शिवारच्या कामांवर सुमारे ७४ कोटी ४२ लाख रूपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. या निधीतून सुमारे ४ हजार ५१९ कामे केली जाणार आहेत. कृषी विभागाने २ हजार २२८ कामे मंजूर केली आहेत. या कामांसाठी २४ कोटी रूपये खर्च येणार आहे. पंचायत समिती विभागाने २५० कामे मंजूर केली आहेत. त्यावर तीन कोटी रूपये खर्च येणार आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने ७२ कामे मंजूर केली आहेत. त्यावर ११ कोटी ५७ लाख रूपये खर्च होणार आहेत. जलसंधारण विभागाने ४२ कामे मंजूर केली. त्यावर ८ कोटी ७३ लाख रूपये खर्च होणार आहेत. जलसंपदा विभागाने केवळ ३ कामे मंजूर केली. त्यावर ८२ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. वनविभागाने १ हजार ९२४ कामे मंजूर केली आहेत. त्यावर ४५ कोटी १९ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.कामे पूर्ण कराशासनाकडून निधी प्राप्त होतो. मात्र सदर निधी खर्च केला जात नाही. ही गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य अडचण आहे. कामे सुरू करून ती पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार