शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

दुर्गम भागात पक्क्या रस्त्यांची वानवा

By admin | Updated: March 18, 2015 01:39 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या राजारामखांदला ते पत्तीगाव, कोत्तागुड्डम, चेरपल्ली या गावाला

राजारामखांदला : अहेरी तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या राजारामखांदला ते पत्तीगाव, कोत्तागुड्डम, चेरपल्ली या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे मातीकाम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आले. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही या पोचमार्गावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना मार्गक्रमन करण्यासाठी यातना सहन कराव्या लागत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राजारामखांदला ते चेरपल्ली या ६.५ किमी अंतराच्या पोचमार्गाचे मातीकाम करण्यात आले. मात्र त्यानंतर या मार्गावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले नाही. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने या मार्गावरील पूल वाहून गेले. पुलाचा काही भाग पूर्णत: खचला. त्यामुळे या भागातील २०० च्या वर लोकवस्तीतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ताच उरला नाही. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात या भागातील नागरिकांचा अहेरी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. रस्त्याच्या सुविधेअभावी पावसाळ्यात या भागातील विद्यार्थी व रूग्णांना काही वेळ बैलबंडीचा आधार घ्यावा लागला. रस्त्याच्या दूरवस्थामुळे वाहन मालक व चालक या मार्गाने वाहन टाकण्यास धजावत नाही. ६.५ किमी अंतराच्या पोचमार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करून या भागातील नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली होती. चर्चेदरम्यान पालकमंत्र्यांनी रस्ता दुरूस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)