शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दुर्गम भागात पक्क्या रस्त्यांची वानवा

By admin | Updated: March 18, 2015 01:39 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या राजारामखांदला ते पत्तीगाव, कोत्तागुड्डम, चेरपल्ली या गावाला

राजारामखांदला : अहेरी तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या राजारामखांदला ते पत्तीगाव, कोत्तागुड्डम, चेरपल्ली या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे मातीकाम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आले. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही या पोचमार्गावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना मार्गक्रमन करण्यासाठी यातना सहन कराव्या लागत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राजारामखांदला ते चेरपल्ली या ६.५ किमी अंतराच्या पोचमार्गाचे मातीकाम करण्यात आले. मात्र त्यानंतर या मार्गावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले नाही. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने या मार्गावरील पूल वाहून गेले. पुलाचा काही भाग पूर्णत: खचला. त्यामुळे या भागातील २०० च्या वर लोकवस्तीतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ताच उरला नाही. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात या भागातील नागरिकांचा अहेरी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. रस्त्याच्या सुविधेअभावी पावसाळ्यात या भागातील विद्यार्थी व रूग्णांना काही वेळ बैलबंडीचा आधार घ्यावा लागला. रस्त्याच्या दूरवस्थामुळे वाहन मालक व चालक या मार्गाने वाहन टाकण्यास धजावत नाही. ६.५ किमी अंतराच्या पोचमार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करून या भागातील नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली होती. चर्चेदरम्यान पालकमंत्र्यांनी रस्ता दुरूस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)