शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

एसपीओंना पोलीस दलात स्थानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 01:51 IST

जानेवारी २०११ मध्ये नियुक्त केलेले प्रशिक्षीत विशेष पोलीस (एसपीओ) कर्मचारी यांना पोलीस दलात सामावून घ्यावे किंवा कमीतकमी २० हजार रूपये वेतन करण्यात यावे,

२०११ मध्ये सेवेला सुरूवात : केवळ तीन हजार रूपये मानधनावरच बोळवणगडचिरोली : जानेवारी २०११ मध्ये नियुक्त केलेले प्रशिक्षीत विशेष पोलीस (एसपीओ) कर्मचारी यांना पोलीस दलात सामावून घ्यावे किंवा कमीतकमी २० हजार रूपये वेतन करण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील ५१ एसपीओ कर्मचाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री (ग्रामीण), वित्त व नियोजन मंत्री तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे केली आहे. या ५१ एसपीओंनी मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, जानेवारी २०११ मध्ये विशेष पोलीस अधिकारी, पोलीस खबरी (एसपीओ) म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी नक्षल्यांचा बिमोड करण्याकरिता केंद्रीय गृहमंत्रालय नवी दिल्ली यांचे १२ आॅक्टोबर २०१० चे आदेशान्वये पदे भरले होते. गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांना केंद्र, राज्य शासनाच्या वतीने राबविलेली मोहीम पूर्ण करण्याकरिता पूर्णपणे पोलिसांचीच जबाबदारी देऊन नियुक्ती केली आहे आणि मानधन म्हणून नाममात्र तीन हजार रूपये दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ सुरू आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी पोलीस शिपायासारखेच पूर्ण प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षणामध्ये बेसीक हत्त्यार प्रशिक्षण, जे. टी. अँड एस. पी. प्रशिक्षण व टारगेट फायरिंग यांचा समावेश आहे. हे सर्व प्रशिक्षण एसपीओंनी पूर्ण केले आहे. यातील अनेक एसपीओंची पोलीस भरतीसाठी लागणारी वयोमर्यादाही निघून गेली आहे. त्यांना सरळ पोलीस शिपाई सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे, अशी मागणी एसपीओंनी केली आहे. तसेच दुर्गम भागातील एसपीओ एकदा गाव सोडून आल्यावर पुन्हा गावाकडे जाऊ शकत नाही. नक्षलवादी त्यांना जीवानीशी ठार मारतात. त्यामुळे त्यांचा आईवडिलांशी संपर्क तुटलेला आहे. २०११ पासून कर्तव्य पार पाडत असताना अनेक वेळा पेट्रोलिंग, आरोपी गार्ड, रोड ओपनिंग, मोर्चा, नाईटगस्त, मोर्चा ड्युटी, नक्षल अभियान, निवडणूक बंदोबस्त जबाबदारी आदी कर्तव्य एसपीओंनी पार पाडले आहे. शहीद एसपीओच्या कुटुंबियांना १० ते १५ लक्ष रूपयांची आर्थिक मदत, शहीद एसपीओ कुटुंबातील सदस्याला शासनाची नोकरी तसेच एसपीओंना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बरोबरीने स्थान देण्यात यावे, अशीही मागणी एसपीओंनी केली आहे. (प्रतिनिधी)