शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

वर्षापासून एटापल्लीला एसडीओची प्रतीक्षा

By admin | Updated: December 3, 2014 22:49 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेला भामरागड तालुका व विकासाच्याबाबत मागे असलेला एटापल्ली तालुका या दोन तालुक्यांना मिळून उपविभागीय कार्यालय एटापल्ली येथे सुरू करण्यात आले. परंतु मागील एक

एटापल्ली : राज्यपालांनी दत्तक घेतलेला भामरागड तालुका व विकासाच्याबाबत मागे असलेला एटापल्ली तालुका या दोन तालुक्यांना मिळून उपविभागीय कार्यालय एटापल्ली येथे सुरू करण्यात आले. परंतु मागील एक वर्षांपासून या उपविभागीय अधिकारी कार्यालयात अधिकारीच नाही. त्यामुळे या दोनही दुर्गम तालुक्यातील नागरिकांना आपल्या कामांसाठी अहेरी उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठावे लागत आहे. एकीकडे शासन मागास भागाच्या विकासाला गती देण्याच्या प्रयत्नात असतांना अशा संवेदनशील भागात उपविभागीय अधिकाऱ्यांसारखे जबाबदारीचे पद वर्षापासून रिक्त असल्याच्या प्रकाराकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिक, विद्यार्थी तसेच सामूहिक लाभाच्या कल्याणकारी योजनांचे लाभार्थी अनेक योजनांपासून वंचित झाले आहेत. एटापल्ली उपविभागातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, नॉनक्रिमिलीअर सर्टीफीकेट व वनहक्क दावे मंजूर करण्याचे काम एटापल्ली उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे होते. भामरागड व एटापल्ली तालुक्यातील नागरिक येथे येत होते. सुरूवातीला चंद्रभान पराते यांची येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. त्यानंतर त्यांची बदली गोंडपिंपरी येथे झाली व उपविभागीय अधिकारी म्हणून राहुल रेखावार येथे रूजू झाले. त्यांचीही लगेच नागपूर येथे बदली करण्यात आली. त्यानंतर मात्र एटापल्ली उपविभागीय कार्यालयाला नवा अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. नवा अधिकारी आला नसल्याने अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे एटापल्ली उपविभागाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. ते अहेरीवरूनच या भागाचे काम पाहतात. त्यामुळे भामरागड व एटापल्ली या दोनही तालुक्यातील नागरिकांना कामासाठी अहेरी गाठावे लागते.दिवसभर काम करून घेण्यासाठी धडपडावे लागते, असे चित्र येथे निर्माण झाले आहे. एटापल्ली तालुक्याचा विस्तार ६० ते ७० किमीच्या परिघात आहे. तर भामरागड तालुक्याचा विस्तार १०० ते १०० किमीच्या परिघात आहे. या भागातील अनेक नागरिक वनहक्क कायद्यानुसार वनजमिनी मिळविण्यासाठी पात्र आहे. मात्र एसडीओ कार्यालयात पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने अनेक वनहक्काचे प्रस्ताव प्रलंबित पडून आहे. (तालुका प्रतिनिधी)