शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

वर्षापासून एटापल्लीला एसडीओची प्रतीक्षा

By admin | Updated: December 3, 2014 22:49 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेला भामरागड तालुका व विकासाच्याबाबत मागे असलेला एटापल्ली तालुका या दोन तालुक्यांना मिळून उपविभागीय कार्यालय एटापल्ली येथे सुरू करण्यात आले. परंतु मागील एक

एटापल्ली : राज्यपालांनी दत्तक घेतलेला भामरागड तालुका व विकासाच्याबाबत मागे असलेला एटापल्ली तालुका या दोन तालुक्यांना मिळून उपविभागीय कार्यालय एटापल्ली येथे सुरू करण्यात आले. परंतु मागील एक वर्षांपासून या उपविभागीय अधिकारी कार्यालयात अधिकारीच नाही. त्यामुळे या दोनही दुर्गम तालुक्यातील नागरिकांना आपल्या कामांसाठी अहेरी उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठावे लागत आहे. एकीकडे शासन मागास भागाच्या विकासाला गती देण्याच्या प्रयत्नात असतांना अशा संवेदनशील भागात उपविभागीय अधिकाऱ्यांसारखे जबाबदारीचे पद वर्षापासून रिक्त असल्याच्या प्रकाराकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिक, विद्यार्थी तसेच सामूहिक लाभाच्या कल्याणकारी योजनांचे लाभार्थी अनेक योजनांपासून वंचित झाले आहेत. एटापल्ली उपविभागातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, नॉनक्रिमिलीअर सर्टीफीकेट व वनहक्क दावे मंजूर करण्याचे काम एटापल्ली उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे होते. भामरागड व एटापल्ली तालुक्यातील नागरिक येथे येत होते. सुरूवातीला चंद्रभान पराते यांची येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. त्यानंतर त्यांची बदली गोंडपिंपरी येथे झाली व उपविभागीय अधिकारी म्हणून राहुल रेखावार येथे रूजू झाले. त्यांचीही लगेच नागपूर येथे बदली करण्यात आली. त्यानंतर मात्र एटापल्ली उपविभागीय कार्यालयाला नवा अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. नवा अधिकारी आला नसल्याने अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे एटापल्ली उपविभागाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. ते अहेरीवरूनच या भागाचे काम पाहतात. त्यामुळे भामरागड व एटापल्ली या दोनही तालुक्यातील नागरिकांना कामासाठी अहेरी गाठावे लागते.दिवसभर काम करून घेण्यासाठी धडपडावे लागते, असे चित्र येथे निर्माण झाले आहे. एटापल्ली तालुक्याचा विस्तार ६० ते ७० किमीच्या परिघात आहे. तर भामरागड तालुक्याचा विस्तार १०० ते १०० किमीच्या परिघात आहे. या भागातील अनेक नागरिक वनहक्क कायद्यानुसार वनजमिनी मिळविण्यासाठी पात्र आहे. मात्र एसडीओ कार्यालयात पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने अनेक वनहक्काचे प्रस्ताव प्रलंबित पडून आहे. (तालुका प्रतिनिधी)