शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लहान झेलिया गावाला रस्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२० च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय आहे.

ठळक मुद्देदोन नाले पार करीत गाठावे लागते गाव : स्वातंत्र्यानंतर अजूनही गावात वीज पोहोचली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा या तालुका मुख्यालयापासून ४१ किमी अंतरावर असलेल्या कटेझरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या लहान झेलिया या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जंगलातून पायवाट तुडवत गाव गाठावे लागते. गावाला जातेवेळी दोन मोठमोठे नाले पडतात. पावसाळ्यात या नाल्यांमध्ये पाणी राहात असल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प होते. अशा स्थितीत स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही हे गाव खऱ्या स्वातंत्र्यापासून वंचितच आहे.हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२० च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय आहे. गावाला जाण्यासाठी दोन मोठे नाले पडतात. नाल्यांवर पूलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील पाणी पार करून गावकऱ्यांना जावे लागते. पक्का रस्ता नसल्याने चारचाकी तर जातच नाही. मोठ्या कठीण प्रसंगाचा सामना करीत दुचाकी गावापर्यंत पोहोचते. पावसाळ्याच्या दिवसात नाल्यात पाणी राहत असल्याने दुचाकीही जात नाही. गरोदर माता किंवा गंभीर स्थितीतील रुग्ण रस्त्याअभावी दगावण्याचा धोका आहे.जिल्हा परिषदेची शाळा आहे. परंतु या ठिकाणी विद्युत नाही. ग्रामपंचायतीने एलईडी टीव्ही दिला आहे. पण विद्युत नसल्याने टीव्ही धूळखात पडून आहे. २०१८ मध्ये विजेचे खांब लावण्यात आले होते. परंतु अजूनपर्यंत गावात वीज पोहोचली नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांनी अजूनपर्यंत विजेचा प्रकाश बघितला नाही. दिव्याच्या मिनमिनत्या प्रकाशातच रात्र काढावी लागते. गावासभोवताल जंगल असल्याने साप, विंचू यांची भीती आहे. गावाची लोकसंख्या कमी आहे. तसेच गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणुकीदरम्यान उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गावात येत नाही. त्यामुळे गावातील समस्या शासन व प्रशासनाच्या लक्षात येत नाही. रस्ता बांधून द्यावा, यासाठी प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र प्रशासन व शासनाने दुर्लक्ष केले आहे. रस्ता बांधावा, नाल्यांवर पुलाचे बांधकाम करावे, वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.गावामध्ये पाण्याची समस्या गंभीरगावात एक हातपंप व दोन सार्वजनिक विहिरी आहेत. यातील दोन्ही विहिरी कुचकामी आहेत. एका विहिरीला पाणीच राहत नाही. दुसरी विहीर मागील वर्षी बांधण्यात आली. परंतु या ठिकाणचा गाळ उपसण्यात आला नाही. त्यामुळे तिचा वापर कुणीच करीत नाही. शेतातील विहिरीचे पाणी वापरले जाते. लाकडे ठेवली असून लाकडांवरून पाणी काढावे लागते.निवडणुकीदरम्यान या गावामध्ये प्रचारही नाहीलहान झेलिया गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. तसेच गावाची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवार या गावांमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी फिरकत नाही. आजर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने या गावाला भेट दिली नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या दशा शासनाला कळू शकल्या नाहीत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक