शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:38 IST

देसाईगंज : विदर्भातील पावसाचे अल्प प्रमाण लक्षात घेता विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत नागपूर विभागातील नऊ जिल्ह्यांत या ...

देसाईगंज : विदर्भातील पावसाचे अल्प प्रमाण लक्षात घेता विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत नागपूर विभागातील नऊ जिल्ह्यांत या उपक्रमाची सुरुवात २०१३पासून करण्यात आली. या उपक्रमातून देसाईगंज तालुक्यातील अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र, देखभालीअभावी तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची वाट लागली आहे. जलसिंचनाला बळकटी देणाऱ्या या उपक्रमाला अखेरची घरघर लागल्याचे चित्र देसाईगंज तालुक्यात दिसून येत आहे.

विदर्भात सिंचन क्षमता वाढावी, यासाठी जलसंधारण विभागाने सन २००३ ते २०१७ हा कृती आराखडा तयार केला होता. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम नागपूरअंतर्गत मुख्य अभियंता लघुसिंचन (जलसंधारण) मंडळ, नागपूर विभाग यांच्याकडे सोपविण्यात आली. या कार्यक्रमात जलसंधारण, मृद संधारण यासाठी कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला. या निधीतून ० ते २५० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता निर्माण करणे, सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे, गाव तलाव, साठवण तलाव, लघु पाटबंधारे शिवकालीन तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे व त्यातील सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे, मामा तलावाचे नूतनीकरण दुरुस्ती व खोलीकरण करणे आदी व यात पाणी वापर संस्थांची स्थापना करून सिंचनाचे नियोजन करणे आदी कामांचा समावेश हाेता.

कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढविणे, हा हेतू असाध्य होऊन काेटयवधी रुपये खर्च दाखवून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा तीळमात्र उपयोग आजच्या घडीस शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना प्रभावीपणे न राबविलेल्या बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

(बॉक्स)

जलयुक्त शिवारचा फायदा काय?

- जिल्ह्यात सिंचनाच्या नावावर विविध योजना धुमधडाक्यात सुरू झाल्या. मात्र, तलाव खोलीकरणापासून तर बंधारे बांधकाम थातुरमातुर करण्यात आले. या योजनेअंतर्गत देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. परंतु शाश्वत शेतीला पाणी मिळून दुष्काळसदृश परिस्थितीत या पाण्याचा उपयोग शेतीला झालाच नाही.

- आज तालुक्यात एकही बंधारा सुस्थितीत नाही. जलशिवार योजनेच्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा शेतकऱ्यांचा आराेप आहे. पाणी अडविण्यासाठी बनविण्यात आलेल्या लोखंडी दरवाजापासून ते बंधाऱ्यांच्या भिंतीसुद्धा अल्पावधीतच निकामी होऊन त्या बंधाऱ्यांची पुरती वाट लागलेली आहे.

090921\1613img_20200719_171600.jpg

तालुक्यातील बंधारेच्या पावसाळ्यात सिंचनासाठी उपयोगात न येता अशा दुरावस्था.