शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:38 IST

देसाईगंज : विदर्भातील पावसाचे अल्प प्रमाण लक्षात घेता विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत नागपूर विभागातील नऊ जिल्ह्यांत या ...

देसाईगंज : विदर्भातील पावसाचे अल्प प्रमाण लक्षात घेता विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत नागपूर विभागातील नऊ जिल्ह्यांत या उपक्रमाची सुरुवात २०१३पासून करण्यात आली. या उपक्रमातून देसाईगंज तालुक्यातील अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र, देखभालीअभावी तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची वाट लागली आहे. जलसिंचनाला बळकटी देणाऱ्या या उपक्रमाला अखेरची घरघर लागल्याचे चित्र देसाईगंज तालुक्यात दिसून येत आहे.

विदर्भात सिंचन क्षमता वाढावी, यासाठी जलसंधारण विभागाने सन २००३ ते २०१७ हा कृती आराखडा तयार केला होता. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम नागपूरअंतर्गत मुख्य अभियंता लघुसिंचन (जलसंधारण) मंडळ, नागपूर विभाग यांच्याकडे सोपविण्यात आली. या कार्यक्रमात जलसंधारण, मृद संधारण यासाठी कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला. या निधीतून ० ते २५० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता निर्माण करणे, सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे, गाव तलाव, साठवण तलाव, लघु पाटबंधारे शिवकालीन तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे व त्यातील सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे, मामा तलावाचे नूतनीकरण दुरुस्ती व खोलीकरण करणे आदी व यात पाणी वापर संस्थांची स्थापना करून सिंचनाचे नियोजन करणे आदी कामांचा समावेश हाेता.

कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढविणे, हा हेतू असाध्य होऊन काेटयवधी रुपये खर्च दाखवून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा तीळमात्र उपयोग आजच्या घडीस शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना प्रभावीपणे न राबविलेल्या बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

(बॉक्स)

जलयुक्त शिवारचा फायदा काय?

- जिल्ह्यात सिंचनाच्या नावावर विविध योजना धुमधडाक्यात सुरू झाल्या. मात्र, तलाव खोलीकरणापासून तर बंधारे बांधकाम थातुरमातुर करण्यात आले. या योजनेअंतर्गत देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. परंतु शाश्वत शेतीला पाणी मिळून दुष्काळसदृश परिस्थितीत या पाण्याचा उपयोग शेतीला झालाच नाही.

- आज तालुक्यात एकही बंधारा सुस्थितीत नाही. जलशिवार योजनेच्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा शेतकऱ्यांचा आराेप आहे. पाणी अडविण्यासाठी बनविण्यात आलेल्या लोखंडी दरवाजापासून ते बंधाऱ्यांच्या भिंतीसुद्धा अल्पावधीतच निकामी होऊन त्या बंधाऱ्यांची पुरती वाट लागलेली आहे.

090921\1613img_20200719_171600.jpg

तालुक्यातील बंधारेच्या पावसाळ्यात सिंचनासाठी उपयोगात न येता अशा दुरावस्था.