शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

देसाईगंज तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:38 IST

देसाईगंज : विदर्भातील पावसाचे अल्प प्रमाण लक्षात घेता विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत नागपूर विभागातील नऊ जिल्ह्यांत या ...

देसाईगंज : विदर्भातील पावसाचे अल्प प्रमाण लक्षात घेता विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत नागपूर विभागातील नऊ जिल्ह्यांत या उपक्रमाची सुरुवात २०१३पासून करण्यात आली. या उपक्रमातून देसाईगंज तालुक्यातील अनेक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. मात्र, देखभालीअभावी तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची वाट लागली आहे. जलसिंचनाला बळकटी देणाऱ्या या उपक्रमाला अखेरची घरघर लागल्याचे चित्र देसाईगंज तालुक्यात दिसून येत आहे.

विदर्भात सिंचन क्षमता वाढावी, यासाठी जलसंधारण विभागाने सन २००३ ते २०१७ हा कृती आराखडा तयार केला होता. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम नागपूरअंतर्गत मुख्य अभियंता लघुसिंचन (जलसंधारण) मंडळ, नागपूर विभाग यांच्याकडे सोपविण्यात आली. या कार्यक्रमात जलसंधारण, मृद संधारण यासाठी कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला. या निधीतून ० ते २५० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता निर्माण करणे, सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे, गाव तलाव, साठवण तलाव, लघु पाटबंधारे शिवकालीन तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे व त्यातील सिंचन क्षमता पुनर्स्थापित करणे, मामा तलावाचे नूतनीकरण दुरुस्ती व खोलीकरण करणे आदी व यात पाणी वापर संस्थांची स्थापना करून सिंचनाचे नियोजन करणे आदी कामांचा समावेश हाेता.

कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढविणे, हा हेतू असाध्य होऊन काेटयवधी रुपये खर्च दाखवून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा तीळमात्र उपयोग आजच्या घडीस शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना प्रभावीपणे न राबविलेल्या बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

(बॉक्स)

जलयुक्त शिवारचा फायदा काय?

- जिल्ह्यात सिंचनाच्या नावावर विविध योजना धुमधडाक्यात सुरू झाल्या. मात्र, तलाव खोलीकरणापासून तर बंधारे बांधकाम थातुरमातुर करण्यात आले. या योजनेअंतर्गत देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. परंतु शाश्वत शेतीला पाणी मिळून दुष्काळसदृश परिस्थितीत या पाण्याचा उपयोग शेतीला झालाच नाही.

- आज तालुक्यात एकही बंधारा सुस्थितीत नाही. जलशिवार योजनेच्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा शेतकऱ्यांचा आराेप आहे. पाणी अडविण्यासाठी बनविण्यात आलेल्या लोखंडी दरवाजापासून ते बंधाऱ्यांच्या भिंतीसुद्धा अल्पावधीतच निकामी होऊन त्या बंधाऱ्यांची पुरती वाट लागलेली आहे.

090921\1613img_20200719_171600.jpg

तालुक्यातील बंधारेच्या पावसाळ्यात सिंचनासाठी उपयोगात न येता अशा दुरावस्था.