शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार ३५० हेक्टरला सिंचनाची प्रतीक्षा

By admin | Updated: February 15, 2015 01:04 IST

गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन ३३ वर्ष झाली. परंतु या जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यात राज्य सरकारला कमालीचे अपयश आले आहे.

अहेरी : गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन ३३ वर्ष झाली. परंतु या जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यात राज्य सरकारला कमालीचे अपयश आले आहे. अहेरी उपविभागात ५० हजार १०० हेक्टर पिकाखालील क्षेत्रापैकी ४५ हजार ३५० हेक्टर जमिन अजुनही सिंचनाखाली आणण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत आहे. अहेरी उपविभागात भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा हे पाच तालुके येतात. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ५० हजार १०० हेक्टर जमिन पिकाखाली आहे. त्यापैकी ४ हजार ५५० हेक्टर जमीन ओलीताची आहे. तर ४५ हजार ५५० हेक्टर आर जमिन कोरडवाहू आहे. पावसाच्या भरवश्यावर या भागातील शेतकरी शेती करीत आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, आदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बोडी, शेततळे, बंधारे, मजग्या आदीचे कामे करण्यात आली. प्रत्यक्षात सर्व कामे कागदोपत्रीच झाल्याने अहेरी उपविभागात केवळ १० टक्यापेक्षा कमी सिंचन व्यवस्था निर्माण होऊ शकली. अहेरी तालुक्यात १५ हजार हेक्टर आर क्षेत्र पिकाखाली आहे. यातील १ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताचे तर १ हजार ४०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. एटापल्ली तालुक्यात १३ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली असून ५५० हेक्टर क्षेत्र ओलीताचे तर १३ हजार १५० कोरडवाहू क्षेत्र आहे. भामरागड तालुक्यात ७ हजार ९०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. पैकी ५०० हेक्टर क्षेत्रावर ओलीताची सोय आहे. ७ हजार २०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. सिरोंचा तालुक्यात १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. पैकी २ हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलीताचे तर ११ हजार हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा वाढविण्यासाठी आजवर आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सिंचन विभाग, कृषी विभाग यांच्याकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु याचा कोणताही फायदा अजूनपर्यंत दिसलेला नाही. (शहर प्रतिनिधी)चेन्ना प्रकल्प रखडलामुलचेरा तालुक्यातीत चेन्ना प्रकल्पाचे काम रखडले असून त्यावेळी धारणाच्या २१़७० मीटर उंचीची भिंत व १० मीटर काम झाल्यानंतर प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले़ १४ किमीचा कालवा बांधण्यात आला़ या प्रकल्पामुळे २२३० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते़ प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर चेन्ना प्रकल्प पूर्ण करण्याचा आश्वासन दिले जाते. विद्यमान पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांनी सुंदरनगर येथे प्रचारसभेत चेन्ना प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दिले आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठी आशा आहे.दोन उपसा सिंचन योजनांना नव्याने मान्यता घ्यावी लागणार अहेरी तालुक्यातील देवलमारी व महागाव गर्रा या दोन उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र वनकायदा आड आल्याने तसेच भूसंपादनाची प्रक्रिया न झाल्याने या दोन्ही सिंचन योजनेचे काम सुरू होऊ शकले नाही. या दोन्ही उपसा सिंचन योजनेची मान्यता व्यपगत झाली आहे. मंजुरीची मुदत संपल्यामुळे पाटबंधारे विभागाला नव्याने प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडून या दोन्ही सिंचन योजनेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. नवीन दराने सदर प्रकल्प सुरू करावा लागणार असून याची किंमतही वाढणार आहे.अहेरी उपविभागातील बांधकामाधीन प्रकल्पाची सद्यस्थितीसिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उपसा सिंचन योजनेला १६ सप्टेंबर २००८ ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी या प्रकल्पाची किमत ३५ कोटी होती. मार्च २०१४ पर्यंत ०.११ लाख रूपयांचा खर्च या योजनेवर झाला. १ एप्रिल २०१४ ला उर्वरित किमत ३४.८९ कोटी आहे. या प्रकल्पामुळे २०५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. २०१४-१५ करिता ०.५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प अगदीच प्राथमिक अवस्थेत असल्याची माहिती चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाने दिली आहे.एटापल्ली तालुक्यातील डुम्मी नाला, मुलचेरा तालुक्यातील चेन्ना या दोन प्रकल्पांना वनबाधिक प्रकल्पाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. चेन्नासाठी ११८.२३ हेक्टर तर डुम्मी नालासाठी ३७५.४५ हेक्टर वनजमिन लागणार आहे. मार्च २०१४ अखेर डुम्मी नालावर ०.७७ लाख रूपयाचा खर्च करण्यात आला आहे. तर चेन्नाला १.४३ लाख रूपयांचा खर्च झाला आहे.सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका, टेकडा, अहेरी तालुक्यातील महागाव, देवलमरी, मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम हे प्रकल्प अन्वेषणाखालील प्रकल्प आहे. पेंटीपाका प्रकल्पाची अध्यावत किमत ४३.०४ कोटी असून २२१८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. १०.७० हेक्टर वनजमिन लागणार आहे. शांतीग्राम प्रकल्पाची अध्यावत किमत ५३.७४ कोटी असून २१०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ९.३० हेक्टर वनजमिन लागणार आहे. महागाव गर्रा या प्रकल्पाची अध्यावत किमत ३९.७७ कोटी तर देवलमरी प्रकल्पाची किमत ४५.०५ कोटी आहे. महागाव गेर्रामुळे ३४५० हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. देवलमरीमुळे ३३.५५ हेक्टर वनजमिन सिंचनाखाली येईल. या प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.