शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: May 15, 2014 02:08 IST

ब्रह्मपुरी परिसरात मागील दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या ६00 शेतकर्‍यांच्या कृषीपंपाकरिता वीजजोडणी मिळणार आहे.

शेतकर्‍यांना दिलासा: लवकरच मिळणार वीज कनेक्शनब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी परिसरात मागील दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या ६00 शेतकर्‍यांच्या कृषीपंपाकरिता वीजजोडणी मिळणार आहे. याबाबत सादर झालेले अर्ज धूळखात असून वीजजोडणीअभावी शेतकर्‍यांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते.निसर्गाच्या लहरीप्रमाणे पावसाचे प्रमाण असल्याने शेतकरी अडचणीत आला.विहिरीत पाणी असूनसूद्धा ते पिकाला देऊ शकत नाही. याला कारण म्हणजे कृषीपंपाला नसलेला वीजपुरवठा परिणामी उभे पीक डोळ्यांसमोर वाळत होते.शेतकर्‍यांचे अशी अवस्था असताना सुद्धा वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले होते. शेतकर्‍यांनी तथा आमदार अतुल देशकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून व्यथा शासनासमोर मांडल्या. दरम्यान शेतकर्‍यांच्या कृषीपंपाच्या वीजजोडणीकरिता शासनाकडून ४५0.४६ लाख रुपये मंजूर झाले आहे. यामुळे हे काम त्वरीत सुरू करावे व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शेतकर्‍यांनी केली आहे.सदर काम आदित्य इलेक्ट्रिकल्स व पद्मावती इलेक्ट्रिकल्स यांना देण्यात आले असून ब्रह्मपुरी विभागात ३00 पंपांना, सिंदेवाही विभागत ९७, तर सावली तालुक्यातील ११४शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना मंजुरी मिळाली आहे. ज्यांनी नोव्हेंबर २0१३ पर्यंत अर्ज सादर केले. अशा शेतकर्‍यांना कृषीपंपाकरिता वीजखांब त्यावरील तार लावून वीजजोडणी मिळणार आहे. या वीजजोडणीकरिता ६३ केव्हीचे ४७ ट्रान्सफार्मर तर १00 केव्हीचे ९व २५ केव्हीचे ट्रान्सफार्मर लागणार असून कामाला लवकरच सुरूवात होऊन शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या व्यथा समजून लगेच वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.मागील अनेक दिवसांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार असून शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील शेतकर्‍यांना वीज पुरवठा त्वरित द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)