शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

९१ गावांना विद्युतीकरणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:06 IST

राज्यशासनाने प्रत्येक गाव प्रकाशमान करण्याचा निर्णय घेऊन ‘गांव-गांव बिजली, घर-घर बिजली’ चा नारा दिला आहे. मात्र जिल्हा निर्मितीच्या ३५ वर्षानंतरही जिल्ह्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले नसून अद्यापही ९१ गावे विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे३५ वर्षानंतरही जैसे थे : धानोरा, अहेरी, एटापल्ली तालुक्यातील अनेक गावांमध्ये अंधार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यशासनाने प्रत्येक गाव प्रकाशमान करण्याचा निर्णय घेऊन ‘गांव-गांव बिजली, घर-घर बिजली’ चा नारा दिला आहे. मात्र जिल्हा निर्मितीच्या ३५ वर्षानंतरही जिल्ह्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाले नसून अद्यापही ९१ गावे विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या गावांमध्ये महावितरणचा उजेड के व्हा पडेल याची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.जिल्ह्यात एकंदरी १ हजार ५१५ गावे आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात १०७, धानोरा २१९, चामोर्शी १८६, मुलचेरा ६७, देसाईगंज ३१, आरमोरी ९१, कुरखेडा १२०, कोरची १२५, अहेरी १५८, सिरोंचा २१५, एटापल्ली १८६ व भामरागड तालुक्यात ११० गावे आहेत. महावितरण कंपनीच्या वतीने विद्युतीकरण मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश गावांचे विद्युतीकरण करण्यास प्रारंभ झाला. त्यानुसार बहुतांश गावांचे विद्युतीकरण करण्यात आले. मात्र भौगोलिक परिस्थितीमुळे काही गावापर्यंत विद्युत तारा पोहोचविणे जिकरीचे होऊन बसल्याने अशा गावात सौर ऊर्जेवरील विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र देखभाल-दुरूस्तीअभावी अनेक गावात सौर ऊर्जेवरील विद्युत पुरवठा बंद पडला.प्राप्त माहिती नुसार धानोरा तालुक्यातील २१९ गावांपैकी १९१ गावात विद्युतीकरण झाले. मुलचेरा तालुक्यातील ६७ पैकी ६४, कुरखेडा तालुक्यातील १२० पैकी ११८, कोरची तालुक्यातील १२५ पैकी १२४, अहेरी तालुक्यातील १५८ पैकी १४६, सिरोंचा तालुक्यातील ११५ पैकी १११, एटापल्ली तालुक्यातील १८६ पैकी १५३ व भामरागड तालुक्यातील ११० पैकी १०२ गावात विद्युतीकरण झाले आहे.चार तालुक्यात १०० टक्के विद्युतीकरणगडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यातील सर्वच गावात १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे. कुरखेडा तालुक्यातील दोन, कोरची तालुक्यातील एक, मुलचेरा तालुक्यातील तीन, सिरोंचा तालुक्यातील चार गावांचे विद्युतीकरण झाल्यानंतर ही गावेसुद्धा १०० टक्के विद्युतीकरण झालेल्या तालुक्यांच्या यादीत समाविष्ट होणार आहेत.