शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

वीज खांबांना अपघाताची प्रतीक्षा

By admin | Updated: July 27, 2016 01:46 IST

आरमोरी शहरातील मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले खांब आजपर्यंत एमएसईबीने अपघात झाल्यानंतरच बाजुला केले आहेत.

वीज विभागाचे होत आहे दुर्लक्ष : आरमोरीत अपघातांचे प्रमाण वाढले; वाहतुकीच्या खोळंब्याने नागरिक त्रस्त विलास चिलबुले  आरमोरी आरमोरी शहरातील मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले खांब आजपर्यंत एमएसईबीने अपघात झाल्यानंतरच बाजुला केले आहेत. सद्य:स्थितीत आता चार खांब रस्त्यावर आहेत. मात्र सदर खांब अजूनपर्यंत बाजुला करण्यात आले नाही. त्यामुळे एमएसईबी सदर खांब हटविण्यासाठी एखाद्या मोठ्या अपघाताचीच प्रतीक्षा करीत असावी, असा उपरोधिक सवाल आरमोरी शहरातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणीसुद्धा होत आहे. आरमोरी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असल्याने या शहरातून नागपूर, गडचिरोली, देसाईगंज व ग्रामीण भागात जाणाऱ्या बसफेऱ्या तसेच जड वाहने ये-जा करतात. त्यामुळे येथील मुख्य मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. शहराच्या विस्तारानंतर अतिक्रमण हटवून मुख्य मार्गाचाही विस्तार करण्यात आला. मात्र मार्गावर असलेले वीज विभागाचे खांब हटविण्यात आले नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत या मार्गावर १० खांब होते. त्यापैकी चार खांब रस्त्याच्या बाजुला होते. उर्वरित सहा खांब रस्त्यावर आले होते. यापैकी दोन खांबांना ट्रकने धडक दिली. या धडकेत सदर खांब पूर्णपणे वाकून निकामी झाले. त्यानंतर सदर खांब वीज विभागाने नव्याने लावून ते रस्त्याच्या बाजुला गाडले. त्याचवेळी उर्वरित चार खांब रस्त्याच्या बाजुला केले असते तर ही समस्या तेव्हाच मिटली असती. मात्र एमएसईबीने तुटलेले दोन खांबच बाजुला गाडले. उर्वरित बँक आॅफ इंडिया, भगतसिंग चौकातील सोमनकर यांच्या घरासमोरील, पंचायत समिती समोरील व बर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील चार खांब अजूनही रस्त्यावरच आहेत. सदर खांब वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. या खांबामुळे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. त्यामुळे सदर खांब हटविणे अत्यंत आवश्यक असले तरी एमएसईबीने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. सदर खांब तत्काळ हटवावे, अशी मागणी आहे. खांबांच्या आड अवैध पार्र्किं ग व अतिक्रमण वाढले रस्त्यावर असलेल्या वीज खांबांमुळे ये-जा करणारी वाहने रस्त्याच्या बाजूने जाऊ शकत नाही. त्यामुळे वीज खांबाच्या बाजूची जागा सुरक्षित मानली जाते. या जागेपर्यंत काही दुकानदारांनी दुकानांचा विस्तार केला आहे व त्या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर या वीज खांबांच्या आड खासगी प्रवासी वाहने उभी केली जातात. याच ठिकाणावरून प्रवाशांचीही वाहतूक करतात. या चार खांबांनी आरमोरीच्या वाहतूक व्यवस्थेची पार वाट लावली आहे. त्यामुळे सदर खांब हटविणे आवश्यक झाले आहे.