शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

वीज खांबांना अपघाताची प्रतीक्षा

By admin | Updated: July 27, 2016 01:46 IST

आरमोरी शहरातील मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले खांब आजपर्यंत एमएसईबीने अपघात झाल्यानंतरच बाजुला केले आहेत.

वीज विभागाचे होत आहे दुर्लक्ष : आरमोरीत अपघातांचे प्रमाण वाढले; वाहतुकीच्या खोळंब्याने नागरिक त्रस्त विलास चिलबुले  आरमोरी आरमोरी शहरातील मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले खांब आजपर्यंत एमएसईबीने अपघात झाल्यानंतरच बाजुला केले आहेत. सद्य:स्थितीत आता चार खांब रस्त्यावर आहेत. मात्र सदर खांब अजूनपर्यंत बाजुला करण्यात आले नाही. त्यामुळे एमएसईबी सदर खांब हटविण्यासाठी एखाद्या मोठ्या अपघाताचीच प्रतीक्षा करीत असावी, असा उपरोधिक सवाल आरमोरी शहरातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणीसुद्धा होत आहे. आरमोरी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असल्याने या शहरातून नागपूर, गडचिरोली, देसाईगंज व ग्रामीण भागात जाणाऱ्या बसफेऱ्या तसेच जड वाहने ये-जा करतात. त्यामुळे येथील मुख्य मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. शहराच्या विस्तारानंतर अतिक्रमण हटवून मुख्य मार्गाचाही विस्तार करण्यात आला. मात्र मार्गावर असलेले वीज विभागाचे खांब हटविण्यात आले नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत या मार्गावर १० खांब होते. त्यापैकी चार खांब रस्त्याच्या बाजुला होते. उर्वरित सहा खांब रस्त्यावर आले होते. यापैकी दोन खांबांना ट्रकने धडक दिली. या धडकेत सदर खांब पूर्णपणे वाकून निकामी झाले. त्यानंतर सदर खांब वीज विभागाने नव्याने लावून ते रस्त्याच्या बाजुला गाडले. त्याचवेळी उर्वरित चार खांब रस्त्याच्या बाजुला केले असते तर ही समस्या तेव्हाच मिटली असती. मात्र एमएसईबीने तुटलेले दोन खांबच बाजुला गाडले. उर्वरित बँक आॅफ इंडिया, भगतसिंग चौकातील सोमनकर यांच्या घरासमोरील, पंचायत समिती समोरील व बर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील चार खांब अजूनही रस्त्यावरच आहेत. सदर खांब वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. या खांबामुळे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. त्यामुळे सदर खांब हटविणे अत्यंत आवश्यक असले तरी एमएसईबीने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. सदर खांब तत्काळ हटवावे, अशी मागणी आहे. खांबांच्या आड अवैध पार्र्किं ग व अतिक्रमण वाढले रस्त्यावर असलेल्या वीज खांबांमुळे ये-जा करणारी वाहने रस्त्याच्या बाजूने जाऊ शकत नाही. त्यामुळे वीज खांबाच्या बाजूची जागा सुरक्षित मानली जाते. या जागेपर्यंत काही दुकानदारांनी दुकानांचा विस्तार केला आहे व त्या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर या वीज खांबांच्या आड खासगी प्रवासी वाहने उभी केली जातात. याच ठिकाणावरून प्रवाशांचीही वाहतूक करतात. या चार खांबांनी आरमोरीच्या वाहतूक व्यवस्थेची पार वाट लावली आहे. त्यामुळे सदर खांब हटविणे आवश्यक झाले आहे.