शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वीज खांबांना अपघाताची प्रतीक्षा

By admin | Updated: July 27, 2016 01:46 IST

आरमोरी शहरातील मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले खांब आजपर्यंत एमएसईबीने अपघात झाल्यानंतरच बाजुला केले आहेत.

वीज विभागाचे होत आहे दुर्लक्ष : आरमोरीत अपघातांचे प्रमाण वाढले; वाहतुकीच्या खोळंब्याने नागरिक त्रस्त विलास चिलबुले  आरमोरी आरमोरी शहरातील मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले खांब आजपर्यंत एमएसईबीने अपघात झाल्यानंतरच बाजुला केले आहेत. सद्य:स्थितीत आता चार खांब रस्त्यावर आहेत. मात्र सदर खांब अजूनपर्यंत बाजुला करण्यात आले नाही. त्यामुळे एमएसईबी सदर खांब हटविण्यासाठी एखाद्या मोठ्या अपघाताचीच प्रतीक्षा करीत असावी, असा उपरोधिक सवाल आरमोरी शहरातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणीसुद्धा होत आहे. आरमोरी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असल्याने या शहरातून नागपूर, गडचिरोली, देसाईगंज व ग्रामीण भागात जाणाऱ्या बसफेऱ्या तसेच जड वाहने ये-जा करतात. त्यामुळे येथील मुख्य मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. शहराच्या विस्तारानंतर अतिक्रमण हटवून मुख्य मार्गाचाही विस्तार करण्यात आला. मात्र मार्गावर असलेले वीज विभागाचे खांब हटविण्यात आले नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत या मार्गावर १० खांब होते. त्यापैकी चार खांब रस्त्याच्या बाजुला होते. उर्वरित सहा खांब रस्त्यावर आले होते. यापैकी दोन खांबांना ट्रकने धडक दिली. या धडकेत सदर खांब पूर्णपणे वाकून निकामी झाले. त्यानंतर सदर खांब वीज विभागाने नव्याने लावून ते रस्त्याच्या बाजुला गाडले. त्याचवेळी उर्वरित चार खांब रस्त्याच्या बाजुला केले असते तर ही समस्या तेव्हाच मिटली असती. मात्र एमएसईबीने तुटलेले दोन खांबच बाजुला गाडले. उर्वरित बँक आॅफ इंडिया, भगतसिंग चौकातील सोमनकर यांच्या घरासमोरील, पंचायत समिती समोरील व बर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील चार खांब अजूनही रस्त्यावरच आहेत. सदर खांब वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. या खांबामुळे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. त्यामुळे सदर खांब हटविणे अत्यंत आवश्यक असले तरी एमएसईबीने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. सदर खांब तत्काळ हटवावे, अशी मागणी आहे. खांबांच्या आड अवैध पार्र्किं ग व अतिक्रमण वाढले रस्त्यावर असलेल्या वीज खांबांमुळे ये-जा करणारी वाहने रस्त्याच्या बाजूने जाऊ शकत नाही. त्यामुळे वीज खांबाच्या बाजूची जागा सुरक्षित मानली जाते. या जागेपर्यंत काही दुकानदारांनी दुकानांचा विस्तार केला आहे व त्या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर या वीज खांबांच्या आड खासगी प्रवासी वाहने उभी केली जातात. याच ठिकाणावरून प्रवाशांचीही वाहतूक करतात. या चार खांबांनी आरमोरीच्या वाहतूक व्यवस्थेची पार वाट लावली आहे. त्यामुळे सदर खांब हटविणे आवश्यक झाले आहे.