शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

१२८७ गावांना ९०.१७ लाखांची प्रतीक्षा

By admin | Updated: January 7, 2015 22:52 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यंदा जिल्ह्यातील एकूण १ हजार २८७ गावांकरिता शासनाने ९० लाख १७ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ग्रामस्थांच्या आरोग्य व सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यंदा जिल्ह्यातील एकूण १ हजार २८७ गावांकरिता शासनाने ९० लाख १७ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ग्रामस्थांच्या आरोग्य व सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. मात्र वर्ष संपायला केवळ दोन महिने शिल्लक असले तरी हा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने संबंधीत लाभार्थ्यांना फटका बसत आहे. जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती असून १ हजार ६६० गावे आहेत. एनआरएचएम अंतर्गत १ हजार २८७ गावांसाठी ९० लाख १७ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर निधी खर्च करण्यासाठी एक समिती गठित करण्यात येते. या समितीच्या अध्यक्षपदी गावचे सरपंच तर सदस्यपदी गावातील अंगणवाडी सेविका राहते. दोघांच्या नावे बँकेत खाते उघडले जाते. नंतर सदर नियोजित निधी त्या खात्यामध्ये जमा केल्या जाते. यानंतर समिती प्रस्ताव आमंत्रित करून निधी खर्च करते. गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्याशी संबंधीत इतर कामे या निधीतून केली जातात. यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्यशासनाकडे व त्यानंतर जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण संस्थेकडे सदर निधी दिला जातो. या निधीतून ग्राम आरोग्य योजना, न्युट्रिशन डे, आरोग्यविषयक ग्रामसभा, ग्राम आरोग्यासाठी खरेदी, कुपोषित बालकांसाठी पोषक तत्त्व योजना, गरोदर महिलांच्या प्रसूतीसाठी प्रवासाची सोय, कुत्रा किंवा सर्पदंश झाल्यास रुग्णालयापर्यंतचा मोफत प्रवास व औषधोपचार तसेच गावागावात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी खर्च करण्याची तरतूद आहे. याशिवाय गावात होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे शुद्धिकरण, शासकीय नळ तुटल्यास त्याची सुधारणा, अंगणवाडीची रंगरंगोटी, दुरूस्ती, फर्निचर तसेच अंगणवाडीतील बालकांसाठी खेळणी खरेदी करण्यावरही सदर निधी खर्च केला जातो. या योजनेतून ० ते ५०० लोकसंख्या असलेल्या गावास ५ हजार रूपये, ५०१ ते १ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या गावास ८ हजार रूपये, १ हजार ५०१ ते ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावास १५ हजार रूपये, १० हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावास २४ हजार रूपये व १० हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावास ३० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. मात्र निधीच उपलब्ध झाला नसल्याने ही सर्व कामे ठप्प पडली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी या निधीची अत्यंत आवश्यकता होती. मात्र निधीच प्राप्त झाले नसल्याने समितीसमोर फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी लाभार्थ्यांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)