शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:23 IST

शासकीय आश्रमशाळेत रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मागील सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. सदर मानधन तत्काळ देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ....

ठळक मुद्देप्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन : शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचा ताण वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासकीय आश्रमशाळेत रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मागील सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. सदर मानधन तत्काळ देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शासकीय आश्रमशाळांमध्ये नियमित कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. काही कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीने नेमण्यात आले आहे. नियमित कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.१० वाजेपर्यंत काम करावेच लागत आहे. शालेय वेळेव्यतीरिक्त त्यांना अनेक कामे करावी लागतात. विद्यार्थ्यांना दवाखान्यात नेणे, पर्यवेक्षिय अभ्यास घेणे, स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी जादा तास घेणे, परीक्षांसाठी व क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना बाहेर गावी नेणे अशी शैक्षणिक व अशैक्षणिक कामे करावे लागतात. या शैक्षणिक कामांचा कोणताही मोबदला दिला जात नाही. या संपूर्ण बांबींचा विचार करून शासन निर्णयाप्रमाणे प्रतिदिन ५ तास प्रमाणे तासिका शिक्षकांना मानधन अदा करावे, तासिका शिक्षक व रोजंदारी बीलाचे प्रतिस्वाक्षरीची पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे मानधन देण्याची पद्धत अवलंबावी. तसिका शिक्षकांच्या बिलांसोबत सादर करण्याचे तासिका विवरण पत्रक बंद करण्यात यावे, प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला रोजंदारी व तासिका शिक्षक कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करावे, सर्व शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी व तासिका कर्मचाऱ्यांचे कार्यत्तर मंजुरी आदेश तत्काळ देण्याची कार्यवाही करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.निवेदन देतेवेळी प्रकल्प प्रमुख महेंद्र अवथरे, ,अश्विन बिसेन, डोके, जुमनाके, मिनाक्षी चक्रवर्ती, समुद्रालवर आदी मानधन शिक्षक उपस्थित होते.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत मानधन तत्वावर काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना शासनाच्या धोरणाप्रमाणे ३१ डिसेंबर पर्यंत भरती पूर्ण करणे आणि यांना सामावून घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या मानधन शिक्षकांना ३१ डिसेम्बर पर्यंत आदेश देण्याच्या सूचना होत्या. पण सदर प्रक्रिया पूर्ण झाले नाही.त्यामुळे मानधन शिक्षकांना परत वाढीव आदेश द्यायचा की काय या बद्दल आयुक्त व अप्पर आयुक्त यांच्याकडून मार्गदर्शन करीत पत्रव्यवहार केले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत आदेशाप्रमाणे वाढीव आदेश दिले जातील. २५ जानेवारी रोजी डी. पी. सी. ची मिटींग आहे त्यात अनुदान प्राप्त होताच आठ दिवसांत यांचे पूर्ण वेतन अदा करण्यात येईल. अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी दिली.