शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

६ हजार ९१३ जणांचे स्वेच्छा रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:12 IST

गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो.

ठळक मुद्दे वर्षभरात ७ हजार २८६ बॅगचा वापर : दोन रक्तपेढीवरच जिल्हाभरातील रूग्णांचा भार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीत शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन रक्तपेढ्या मिळून एकूण ६ हजार ९१३ बॅग इतक्या रक्ताचे संकलन झाले. तर ७ हजार २८६ बॅग रक्ताचा वापर विविध आजाराच्या रूग्णांसाठी वर्षभरात करण्यात आला. यावरून ३७३ बॅग इतके रक्त जिल्हाबाहेरून आणावे लागले.जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्त पेढीमार्फत २०१७ मध्ये वर्षभरात १३६ रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून एकूण ५ हजार ९९० बॅग रक्ताचे संकलन झाले. यापैकी ४ हजार ८७९ बॅग रक्त जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांसाठी लावण्यात आले. तर ९१६ बॅग रक्त इतर खासगी रूग्णालयातील रूग्णांसाठी पुरविण्यात आले. जिल्ह्यात जिल्हास्तरावर गडचिरोली येथे १ व अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात १ अशा दोनच रक्तपेढ्या आहेत. तर पाच ठिकाणच्या रूग्णालयात रक्तसाठा केंद्राची व्यवस्था आहे.कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयासह आरमोरी, धानोरा, चामोर्शी व सिरोंचा या चार ग्रामीण रूग्णालयात रक्तसाठा केंद्र आहे. अहेरी येथील रक्तपेढीच्या माध्यमातून वर्षभरात ९१६ बॅग रक्ताचे संकलन करण्यात आले. तर या रक्तपेढीतर्फे १ हजार ८६ रूग्णांसाठी रक्ताचा वापर करण्यात आला. रक्तदात्यांपेक्षा रक्ताची आवश्यकता असलेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा नेहमीच तुटवडा असतो. तत्काळ व सहज सर्व रूग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. याकरिता वर्षभर विविध संघटना, राजकीय पक्ष, शाळा, महाविद्यालय, तसेच युवक व खेळाडूंचा पुढाकार वाढणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे दान जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे तेव्हाच गडचिरोली जिल्ह्यातील रक्त संकलन व साठा वाढू शकते. गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती व अंतराचा विचार करता गडचिरोली जिल्ह्यात रक्तपेढींची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुराव्याची गरज आहे. वाढदिवस व इतर उत्सवाच्या निमित्ताने स्वेच्छा रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.जीवन अमृत सेवेचा ९८४ रूग्णांना लाभगडचिरोली जिल्ह्यातील दोन रक्तपेढींमार्फत रूग्णांना रक्त पुरविले जाते. मात्र गंभीर रूग्णांना तातडीने रक्ताची गरज भासल्यास रक्त वेळेवर उपलब्ध होऊन संबंधित रूग्णाचे प्राण वाचावे यासाठी शासनाच्या वतीने जीवन अमृत सेवा योजना राबविली जात आहे. सदर योजनेंतर्गत जिल्हा रूग्णालयासह चार रूग्णालय संलग्नित आहेत. या योजनेंतर्गत ४० किमी अंतरापर्यंत फोन केल्यास काही वेळात रक्त पोहोचविले जाते. जीवन अमृत सेवा योजनेंतर्गत २०१७ मध्ये वर्षभरात ९८४ रूगणांना लाभ देण्यात आला. सदर योजनेमुळे ९८४ जणांचे प्राण वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ७९, फेब्रवारी ५८, मार्च ७७, एप्रिल ६७, मे ५७, जून ६२, जुलै ८३, आॅगस्ट ९४, सप्टेंबर १५०, आॅक्टोबर १०७, नोव्हेंबर ७५, डिसेंबर महिन्यात ७५ रूग्णांना जीवन अमृत सेवेंतर्गत रक्त लावण्यात आले.