शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

६ हजार ९१३ जणांचे स्वेच्छा रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:12 IST

गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो.

ठळक मुद्दे वर्षभरात ७ हजार २८६ बॅगचा वापर : दोन रक्तपेढीवरच जिल्हाभरातील रूग्णांचा भार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीत शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन रक्तपेढ्या मिळून एकूण ६ हजार ९१३ बॅग इतक्या रक्ताचे संकलन झाले. तर ७ हजार २८६ बॅग रक्ताचा वापर विविध आजाराच्या रूग्णांसाठी वर्षभरात करण्यात आला. यावरून ३७३ बॅग इतके रक्त जिल्हाबाहेरून आणावे लागले.जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्त पेढीमार्फत २०१७ मध्ये वर्षभरात १३६ रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून एकूण ५ हजार ९९० बॅग रक्ताचे संकलन झाले. यापैकी ४ हजार ८७९ बॅग रक्त जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांसाठी लावण्यात आले. तर ९१६ बॅग रक्त इतर खासगी रूग्णालयातील रूग्णांसाठी पुरविण्यात आले. जिल्ह्यात जिल्हास्तरावर गडचिरोली येथे १ व अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात १ अशा दोनच रक्तपेढ्या आहेत. तर पाच ठिकाणच्या रूग्णालयात रक्तसाठा केंद्राची व्यवस्था आहे.कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयासह आरमोरी, धानोरा, चामोर्शी व सिरोंचा या चार ग्रामीण रूग्णालयात रक्तसाठा केंद्र आहे. अहेरी येथील रक्तपेढीच्या माध्यमातून वर्षभरात ९१६ बॅग रक्ताचे संकलन करण्यात आले. तर या रक्तपेढीतर्फे १ हजार ८६ रूग्णांसाठी रक्ताचा वापर करण्यात आला. रक्तदात्यांपेक्षा रक्ताची आवश्यकता असलेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा नेहमीच तुटवडा असतो. तत्काळ व सहज सर्व रूग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. याकरिता वर्षभर विविध संघटना, राजकीय पक्ष, शाळा, महाविद्यालय, तसेच युवक व खेळाडूंचा पुढाकार वाढणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे दान जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे तेव्हाच गडचिरोली जिल्ह्यातील रक्त संकलन व साठा वाढू शकते. गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती व अंतराचा विचार करता गडचिरोली जिल्ह्यात रक्तपेढींची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुराव्याची गरज आहे. वाढदिवस व इतर उत्सवाच्या निमित्ताने स्वेच्छा रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.जीवन अमृत सेवेचा ९८४ रूग्णांना लाभगडचिरोली जिल्ह्यातील दोन रक्तपेढींमार्फत रूग्णांना रक्त पुरविले जाते. मात्र गंभीर रूग्णांना तातडीने रक्ताची गरज भासल्यास रक्त वेळेवर उपलब्ध होऊन संबंधित रूग्णाचे प्राण वाचावे यासाठी शासनाच्या वतीने जीवन अमृत सेवा योजना राबविली जात आहे. सदर योजनेंतर्गत जिल्हा रूग्णालयासह चार रूग्णालय संलग्नित आहेत. या योजनेंतर्गत ४० किमी अंतरापर्यंत फोन केल्यास काही वेळात रक्त पोहोचविले जाते. जीवन अमृत सेवा योजनेंतर्गत २०१७ मध्ये वर्षभरात ९८४ रूगणांना लाभ देण्यात आला. सदर योजनेमुळे ९८४ जणांचे प्राण वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ७९, फेब्रवारी ५८, मार्च ७७, एप्रिल ६७, मे ५७, जून ६२, जुलै ८३, आॅगस्ट ९४, सप्टेंबर १५०, आॅक्टोबर १०७, नोव्हेंबर ७५, डिसेंबर महिन्यात ७५ रूग्णांना जीवन अमृत सेवेंतर्गत रक्त लावण्यात आले.