शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

अधिकाऱ्यांची आश्रमशाळेला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:16 IST

आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत रामगड येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविले जात असल्याच्या मुद्यावरून तेथील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला.

ठळक मुद्देरामगडातील प्रकार : निकृष्ट भोजनावरून विद्यार्थी व मुख्याध्यापकात झाली होती बाचाबाची

ऑनलाईन लोकमतकुरखेडा : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत रामगड येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविले जात असल्याच्या मुद्यावरून तेथील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला. सदर प्रकाराची माहिती कळताच दुसऱ्या दिवशी मंगळवारला पदाधिकारी व गडचिरोली प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी थेट रामगडची आश्रमशाळा गाठली. येथे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी चर्चा करून वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील एका बंद खोलीत साठवून ठेवलेल्या धान्य व इतर साहित्याचा पंचनामा केल्याची माहिती आहे. शासनाकडून वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता पुरविण्यात आलेले धान्य व इतर साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून न देता त्याची विल्हेवाट इतरत्र लावण्यात येते, असा आरोप करीत सदर धान्य कोठीत न ठेवता एका बंद खोलीत साठवून ठेवण्यात आला. सदर कुलूप बंद खोली उघडून दाखविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी अधीक्षकांकडे केली होती. मात्र ही मागणी अधीक्षकाने धुडकावून लावल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. सोमवारी सकाळपासूनच येथील अधीक्षक गैरहजर असल्याने याबाबत मुख्याध्यापकांकडे विद्यार्थ्यांनी तगादा लावला. दरम्यान मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये वाद उफाळला. त्यानंतर मंगळवारी पं. स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दुनेदार, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, पं. स. सदस्य बौद्धकुमार लोणारे, गुरूदेव टेकाम, हरिराम टेकाम तसेच पं. स. शिक्षण विस्तार अधिकारी वाघाडे, सहायक प्रकल्प अधिकारी लांडे, शिक्षण विस्तार अधिकारी मडावी यांनी शाळेत जाऊन कुलूपबंद खोलीचा पंचनामा केला. यावेळी येथे धान्य व ब्लँकेट, फिनाईन व इतर साहित्य आढळून आले.मुख्याध्यापक व अधीक्षक गैरहजररामगडच्या आश्रमशाळेला पदाधिकारी तसेच आदिवासी प्रकल्प व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी भेट दिली असता, यावेळी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक गैरहजर होते. या संदर्भात पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भोजनात दर्जा ठेवण्याची सूचना अधिकारी व पदाधिकाºयांनी केली.