शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

अधिकाऱ्यांची आश्रमशाळेला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:16 IST

आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत रामगड येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविले जात असल्याच्या मुद्यावरून तेथील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला.

ठळक मुद्देरामगडातील प्रकार : निकृष्ट भोजनावरून विद्यार्थी व मुख्याध्यापकात झाली होती बाचाबाची

ऑनलाईन लोकमतकुरखेडा : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत रामगड येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविले जात असल्याच्या मुद्यावरून तेथील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला. सदर प्रकाराची माहिती कळताच दुसऱ्या दिवशी मंगळवारला पदाधिकारी व गडचिरोली प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी थेट रामगडची आश्रमशाळा गाठली. येथे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी चर्चा करून वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील एका बंद खोलीत साठवून ठेवलेल्या धान्य व इतर साहित्याचा पंचनामा केल्याची माहिती आहे. शासनाकडून वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता पुरविण्यात आलेले धान्य व इतर साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून न देता त्याची विल्हेवाट इतरत्र लावण्यात येते, असा आरोप करीत सदर धान्य कोठीत न ठेवता एका बंद खोलीत साठवून ठेवण्यात आला. सदर कुलूप बंद खोली उघडून दाखविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी अधीक्षकांकडे केली होती. मात्र ही मागणी अधीक्षकाने धुडकावून लावल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. सोमवारी सकाळपासूनच येथील अधीक्षक गैरहजर असल्याने याबाबत मुख्याध्यापकांकडे विद्यार्थ्यांनी तगादा लावला. दरम्यान मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये वाद उफाळला. त्यानंतर मंगळवारी पं. स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दुनेदार, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, पं. स. सदस्य बौद्धकुमार लोणारे, गुरूदेव टेकाम, हरिराम टेकाम तसेच पं. स. शिक्षण विस्तार अधिकारी वाघाडे, सहायक प्रकल्प अधिकारी लांडे, शिक्षण विस्तार अधिकारी मडावी यांनी शाळेत जाऊन कुलूपबंद खोलीचा पंचनामा केला. यावेळी येथे धान्य व ब्लँकेट, फिनाईन व इतर साहित्य आढळून आले.मुख्याध्यापक व अधीक्षक गैरहजररामगडच्या आश्रमशाळेला पदाधिकारी तसेच आदिवासी प्रकल्प व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी भेट दिली असता, यावेळी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक गैरहजर होते. या संदर्भात पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भोजनात दर्जा ठेवण्याची सूचना अधिकारी व पदाधिकाºयांनी केली.