शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांची दुष्काळग्रस्त भागाला भेट

By admin | Updated: August 24, 2015 01:29 IST

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी शुक्रवारी विधानसभा क्षेत्रातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन पिकांची परिस्थिती जाणून घेतली.

शेतकऱ्यांसोबत चर्चा : शासनाकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणारदेसाईगंज : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी शुक्रवारी विधानसभा क्षेत्रातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन पिकांची परिस्थिती जाणून घेतली. त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. दुष्काळग्रस्त परिस्थिती शासनाच्या लक्षात आणून देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आ. गजबे यांनी शेतकऱ्यांना दिले.आरमोरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या कुरखेडा तालुक्यात ६ हजार २०४ हेक्टरवर धानपिकाची रोवणी तर १ हजार ५२० हेक्टरवर आवत्या, आरमोरी तालुक्यात ३ हजार ३६२ हेक्टरवर रोवणी तर ३ हजार ३७० हेक्टरवर आवत्या, देसाईगंज तालुक्यात ८ हजार ३९६ हेक्टरवर रोवणी तर ४०७ हेक्टरवर आवत्या, कोरची तालुक्यात २ हजार १८७ हेक्टरवर रोवणी तर ५ हजार ६२१ हेक्टरवर आवत्या पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षीच्या हंगामात पाऊस कमी पडल्याने अजूनही काही ठिकाणी धानपिकाची रोवणी झाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे, अशा शेतकऱ्यांचे धानपीक अडचणीत आले आहे. ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आ. क्रिष्णा गजबे यांनी देसाईगंज तालुक्यातील फरी, झरी, उसेगाव, शिवराजपूर, कुरूड, सावंगी, आरमोरी तालुक्यातील बोरी, वडधा, वैरागड, कुरखेडा तालुक्यातील कढोली, उराडी या गावातील शेतांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान काही भागांमध्ये विदारक परिस्थिती असल्याचे दिसून आले. कोरेगाव चोप परिसरात संपूर्ण पावसाळ्यात केवळ दोनवेळा पाऊस झाला. त्यामुळे या परिसरातील दहा टक्केही रोवणी पूर्ण झाली नाही. काही शेतकऱ्यांचे पऱ्हे करपण्याच्या मार्गावर आहेत. पऱ्हे करपल्याने रोवणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कढोली परिसरातही भयावह परिस्थिती दिसून आली. प्रत्यक्ष बांधावर जाऊन आमदारांनी शेताची पाहणी करण्याबरोबरच संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी काही शेतकऱ्यांनी मागील २० वर्षांत असा दुष्काळ उद्भवला नाही, असे अनुभव कथन केले. शेतकरीवर्ग धानाच्या पिकावर वर्षभराची गुजराण करतात. मात्र यावर्षी धानाचे पीक होणार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांची पाठीशी उभे राहील, असेही आ. गजबे म्हणाले. (वार्ताहर)