शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

विसोरा-शंकरपूर मार्ग खड्ड्यात

By admin | Updated: September 21, 2014 23:51 IST

देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूर दरम्यान दोन किमी अंतर असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा गावकऱ्यांनी

विसोरा : देसाईगंज तालुक्यातील विसोरा ते शंकरपूर दरम्यान दोन किमी अंतर असलेल्या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकदा गावकऱ्यांनी प्रशासनाकडे लावून धरली होती. मात्र संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सदर मार्ग खड्ड्यात असल्याचे चित्र आहे. देसार्इंज-कुरखेडा या मुख्य मार्गावर विसोरा व शंकरपूर हे अवघ्या दोन किमी अंतरावर असलेली महत्त्वाची गावे, या दोन गावांच्या दरम्यान गाढवी नदी वाहते. सद्यस्थितीत या नदीवर असलेल्या ठेंगण्या पुलामुळे पावसाच्या दिवसात आठ ते दहा वेळा रहदारी बंद होते. त्यामुळे सदर नदीवर मागील तीन वर्षापासून उंच पूल बांधण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु अजूनही हे काम अपूर्णच आहे. पावसाच्या दिवसात काम बंद राहत असल्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या पाहणीवरून येत्या वर्षभरातही हे काम पूर्ण होणार की नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे. या पुलाच्या बांधकामासाठी संबंधीत विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता उंच करण्यासाठी डांबरावर मातीचा भरणा केला आहे. यामुळे रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, विसोरा ते शंकरपूर हे दोन किलोमीटरचे अंतर पार करायला पाच मिनिटाऐवजी आजघडीला अर्धा तास लागत आहे. वडसा ते कुरखेडा या मार्गे ये-जा करण्यासाठी वडसा-एकलपूर-कोरेगाव-शंकरपूर-कुरखेडा हा पर्यायी मार्ग आहे. मात्र या पर्यायी मार्गाने गेल्यास १० ते १२ किमी अंतराचा फेरा होतो. मात्र असे असले तरीही देसाईगंज-विसोरा-शंकरपूर-कुरखेडा याच मार्गाने सर्वात जास्त वाहनधारक खड्डे, धुळीचा त्रास सहन करून वाहने चालविणे पसंत करत आहेत, असे दिसते. परिणामी विसोरा-शंकरपूर या मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग गडचिरोली, नागपूर, कोरची, या शहरांकडे जात असल्याने जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते तरीही रस्त्याच्या दुरवस्थेकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. संबंधीत विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याची नागरिकांची चर्चा आणि या बाबतीत आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्यावर पडलेले लहान मोठे शेकडो खड्डे तत्काळ बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)