शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

मजुरांच्या मदतीसाठी सरसावले गावकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते अरु ण कुनघाडकर यांच्याशी संपर्क ठेवला.

ठळक मुद्दे२५० किमीची पायपीट । तेलंगणातून येताच विलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील कुनघाडा (रै) येथील १२ शेतमजूर तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातल्या निरदगोंडा गावात मजुरी करण्यास गेले होते. पण लॉकडाऊननंतर राज्यांच्या सीमा सिल होऊन मजुरीही बंद झाली. कमावलेला पैसाही खर्च झाला. अखेर त्यांनी तब्बल २५० किलोमीटरचे अंतर पायी पार करत आपले गाव गाठले. अनेक गावांमध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारला जात असताना या गावकऱ्यांनी मात्र त्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांचे गावातच विलगीकरणही केले.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते अरु ण कुनघाडकर यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांनी त्यांना हिंमत देत तेथील सरकारकडून काही मदतही करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावात परत आल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.अखेर मजल-दरमजल करत सकाळी हे मजूर महाराष्टÑाच्या वेशीवर आले. अरु ण कुनघाडकर यांनी त्यांना कुनघाडापर्यंत आणण्यासाठी आमदार डॉ.देवराव होळी यांच्याशी संपर्क केला. डॉ.होळी यांनी लगेच त्या मजुरांसाठी अ‍ॅम्बलन्स पाठवून त्यांना गावापर्यंत नेऊन सोडण्याची आणि गावातच सुरक्षित विलगीकरण करण्याची सूचना केली. तहसीलदार संजय गंगथळे, नायब तहसीलदार तंगुलवार व तालुका आरोग्य अधिकारी यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी सर्वाची कुनघाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून आवश्यक औषधोपचारही केला. सर्वांचे सुरक्षित विलगीकरण करण्यात आले. यावेळी कुनघाडाचे सरपंच अविनाश चलाख, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार यांच्यासह गावकऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले.एकीकडे अनेक गावात सध्या बाहेरून आलेल्या नागरिकांकडे शंकेने पाहून त्यांना गावात प्रवेशही दिला जात नाही. परंतु कुनघाडा येथील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व गावकºयांनी त्या १२ मजुरांना मानविय दृष्टिकोनातून मदत करून त्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षित विलगीकरण केले. त्यांची ही माणुसकी इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

टॅग्स :Labourकामगार