शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या मदतीसाठी सरसावले गावकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते अरु ण कुनघाडकर यांच्याशी संपर्क ठेवला.

ठळक मुद्दे२५० किमीची पायपीट । तेलंगणातून येताच विलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील कुनघाडा (रै) येथील १२ शेतमजूर तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातल्या निरदगोंडा गावात मजुरी करण्यास गेले होते. पण लॉकडाऊननंतर राज्यांच्या सीमा सिल होऊन मजुरीही बंद झाली. कमावलेला पैसाही खर्च झाला. अखेर त्यांनी तब्बल २५० किलोमीटरचे अंतर पायी पार करत आपले गाव गाठले. अनेक गावांमध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारला जात असताना या गावकऱ्यांनी मात्र त्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांचे गावातच विलगीकरणही केले.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते अरु ण कुनघाडकर यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांनी त्यांना हिंमत देत तेथील सरकारकडून काही मदतही करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावात परत आल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.अखेर मजल-दरमजल करत सकाळी हे मजूर महाराष्टÑाच्या वेशीवर आले. अरु ण कुनघाडकर यांनी त्यांना कुनघाडापर्यंत आणण्यासाठी आमदार डॉ.देवराव होळी यांच्याशी संपर्क केला. डॉ.होळी यांनी लगेच त्या मजुरांसाठी अ‍ॅम्बलन्स पाठवून त्यांना गावापर्यंत नेऊन सोडण्याची आणि गावातच सुरक्षित विलगीकरण करण्याची सूचना केली. तहसीलदार संजय गंगथळे, नायब तहसीलदार तंगुलवार व तालुका आरोग्य अधिकारी यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी सर्वाची कुनघाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून आवश्यक औषधोपचारही केला. सर्वांचे सुरक्षित विलगीकरण करण्यात आले. यावेळी कुनघाडाचे सरपंच अविनाश चलाख, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार यांच्यासह गावकऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले.एकीकडे अनेक गावात सध्या बाहेरून आलेल्या नागरिकांकडे शंकेने पाहून त्यांना गावात प्रवेशही दिला जात नाही. परंतु कुनघाडा येथील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व गावकºयांनी त्या १२ मजुरांना मानविय दृष्टिकोनातून मदत करून त्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षित विलगीकरण केले. त्यांची ही माणुसकी इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

टॅग्स :Labourकामगार