शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला ठोकले कुलूप

By admin | Updated: April 19, 2017 02:07 IST

जिल्ह्यात वाढत्या उष्णतामानाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे.

२२ लाख खर्चूनही समस्या कायमच : चोप येथे अत्यल्प पाणी पुरवठ्याने महिला व नागरिक संतप्त गडचिरोली : जिल्ह्यात वाढत्या उष्णतामानाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अनेक गावांत विहिरी कोरडया पडल्या आहेत. हातपंप बंद पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तर सोमवारी रात्री देसाईगंज तालुक्याच्या चोप येथे नळ योजनेतून पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना घडली. कोरेगाव/चोप : देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत चोप ग्रामपंचातीत सन २००७-०८ या वर्षात २२ लाख रूपये खर्चून जलस्वराज्य योजनेतून पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी मर्यादित लोकसंख्या असल्यामुळे तात्पुरती गरज भासली. परंतु आता नळ कनेक्शनची संख्या वाढली असून वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही प्रत्येक घरात होऊ लागली आहे. त्यामुळे जुन्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कमी पडत आहे. त्यामुळे चोप गावात पाणी टंचाईची समस्या भिषण झाली आहे. नागरिकांना दोन घागरी पाणी मिळणेही कठीण झाल्याने संप्तत झालेल्या ग्रामस्थांनी चोप ग्रामपंचायतीवर मोर्चा नेऊन सोमवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना घडली आहे. चोप गावची लोकसंख्या ३ हजार २३३ असून लोकसंख्येवर आधारित १ लाख ३० हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी गावात आहे. पण ग्रामपंचायत कार्यालयाच्या नियोजन शुन्यतेमुळे चोप गावात काही भागात ७० टक्के तर काही भागात ३० टक्के पाण्याची विभागणी झाली आहे. गावात मोठ्या प्रमाणावर बोअरवेल बंद झाले असून गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी सुध्दा आटलेली आहे. त्यामुळे चोपमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. महिलांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संप्तत झालेल्या नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. जोपर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू होणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना निवेदनातून दिला आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, गावापासून दीड किमी अंतरावर गाढवी नदी वाहते. तरीही या गावात पाणी समस्येचे संकट ओढावले आहे. नागरिकांना नळाचे पाणी मिळण्यास चोप येथे मोठी अडचण होत आहे. (वार्ताहर)