शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला ठोकले कुलूप

By admin | Updated: April 19, 2017 02:07 IST

जिल्ह्यात वाढत्या उष्णतामानाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे.

२२ लाख खर्चूनही समस्या कायमच : चोप येथे अत्यल्प पाणी पुरवठ्याने महिला व नागरिक संतप्त गडचिरोली : जिल्ह्यात वाढत्या उष्णतामानाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अनेक गावांत विहिरी कोरडया पडल्या आहेत. हातपंप बंद पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तर सोमवारी रात्री देसाईगंज तालुक्याच्या चोप येथे नळ योजनेतून पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना घडली. कोरेगाव/चोप : देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत चोप ग्रामपंचातीत सन २००७-०८ या वर्षात २२ लाख रूपये खर्चून जलस्वराज्य योजनेतून पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी मर्यादित लोकसंख्या असल्यामुळे तात्पुरती गरज भासली. परंतु आता नळ कनेक्शनची संख्या वाढली असून वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही प्रत्येक घरात होऊ लागली आहे. त्यामुळे जुन्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कमी पडत आहे. त्यामुळे चोप गावात पाणी टंचाईची समस्या भिषण झाली आहे. नागरिकांना दोन घागरी पाणी मिळणेही कठीण झाल्याने संप्तत झालेल्या ग्रामस्थांनी चोप ग्रामपंचायतीवर मोर्चा नेऊन सोमवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना घडली आहे. चोप गावची लोकसंख्या ३ हजार २३३ असून लोकसंख्येवर आधारित १ लाख ३० हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी गावात आहे. पण ग्रामपंचायत कार्यालयाच्या नियोजन शुन्यतेमुळे चोप गावात काही भागात ७० टक्के तर काही भागात ३० टक्के पाण्याची विभागणी झाली आहे. गावात मोठ्या प्रमाणावर बोअरवेल बंद झाले असून गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी सुध्दा आटलेली आहे. त्यामुळे चोपमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. महिलांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संप्तत झालेल्या नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. जोपर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू होणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना निवेदनातून दिला आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, गावापासून दीड किमी अंतरावर गाढवी नदी वाहते. तरीही या गावात पाणी समस्येचे संकट ओढावले आहे. नागरिकांना नळाचे पाणी मिळण्यास चोप येथे मोठी अडचण होत आहे. (वार्ताहर)