शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

विदर्भ समिती पंतप्रधानांना विचारणार जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 01:17 IST

लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चासह...

३१ ला दिल्लीत धरणे आंदोलन : स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय?गडचिरोली : लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चासह ५० टक्के मुनाफा एवढा हमीभाव व शेतकऱ्यांच्या इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत येऊन बावीस ते तेवीस महिन्यांचा कालावधी उलटूनही स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. याचा जाब पंतप्रधानांना विचारण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ३१ मार्च रोजी दिल्ली येथे जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य समितीच्या वतीने देण्यात आली.स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २०१३, २०१५ व आता ३१ मार्चला धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातून बहुसंख्य विदर्भवादी शेतकरी सहभागी होणार आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्यासह कर्जमुक्ती, भारनियमन बंद, वीज दर निम्मे करणे, चार लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग संपविणे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्र परिषदेला अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अ‍ॅड. नंदा पराते, अरूण केदार, अरूण मुनघाटे, राजेंद्रसिंह ठाकूर, रमेश भुरसे, चंद्रशेखर भडांगे, प्रतिभा चौधरी, रमेश उप्पलवार, प्रा. ओमप्रकाश, समय्या पसुला, मीनाक्षी गेडाम, रमेश नायडू, रमेश बारसागडे, एजाज शेख, अमिता मडावी, रमेश मडावी व पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रणदिल्ली येथे ३१ मार्च रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनात मार्गदर्शन करण्याकरिता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखराव यांना विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने निमंत्रण पाठविण्यात आले आहे. समितीच्या वतीने २८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत प्रमुख नेत्यांच्या भेटीही घेतल्या जाणार आहेत.