शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

राजोलीवासीयांनी अडविले खासदार व आमदारांचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:36 IST

कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देअर्धवट पुलाने रहदारीस अडथळा : पाच कोटी निधी देण्याचे खासदारांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली. नागरिकांच्या मागण्यांना मान देत आमदार व खासदारांनी पुलाची पाहणी केली. या पुलाच्या पूर्ण बांधकामासाठी पाच कोटी रूपये उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन दिले.खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी हे रविवारी धानोरा येथील भारतीय जनता पार्टीच्या मंडळ कार्यकर्ता प्रशिक्षणाला गेले होते. आमदार व खासदार आल्याची माहिती कळताच पंचायत समिती सदस्य महागू वाडगुरे, माजी सरपंच लाला गेडाम, ग्रामसभा सदस्य मनोहर गुरनुले यांच्या नेतृत्वात राजोलीवासीयांनी धानोरा गाठले. आमदार व खासदार यांना घेराव घालून पुलाच्या गंभीर स्थितीबाबत अवगत केले. प्रत्यक्ष पुलाची पाहणी केल्याशिवाय नागरिकांच्या समस्या लक्षात येणार नाही, ही बाब राजोलीवासीयांनी खासदारांना पटवून दिली. प्रत्यक्ष पुलाची पाहणी करण्याची मागणी केली.त्याचबरोबर पूल बांधकामासाठी निधी देण्याबाबत निवेदनही सादर केले. खासदार व आमदारांनी प्रत्यक्ष नदीकाठी जाऊन पुलाची पाहणी केली. पूल अर्धवट असल्याने विद्यार्थी व नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचे दिसून आले. समस्येची गंभीरता लक्षात घेऊन पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले.अशी आहे कठाणी नदीवरील पुलाची दयनीय स्थितीधानोरा तालुकास्थळापासून ८ किमी अंतरावर असलेल्या राजोली येथील कठाणी नदीवर २०१५ साली बांधलेला पूल अर्धवट आहे. या पुलामुळे राजोलीवासीयांना धानोरा येथे जाण्यासाठी ५ किमीचे अंतर कमी झाले. अन्यथा नागरिकांना नवरगाव-सोडे मार्गे यावे लागत होते. कंत्राटदाराने पूल बांधताना तो अगदी नदीच्या काठापर्यंत बांधणे आवश्यक होते. मात्र काठापर्यंत पूल बांधला नाही. पुलाजवळील पिचिंग व्यवस्थित केली नाही. परिणामी काठाजवळील माती वाहून गेली. त्याचबरोबर दरवर्षी नदीकाठाचा विस्तार होत असल्याने पूल व नदीचे काठ यामध्ये जवळपास आता ५० फुटांचे अंतर पडले आहे. पूल व नदीची पातळी यामध्ये खड्डा निर्माण झाला आहे. पाऊस पडून नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर ५० फुटाच्या अंतरात पाणी राहते. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद राहते. पूल ते नदीपात्र जवळपास १० फूट अंतर आहे. प्रशासनाने तीन फूट उंचीचे सिमेंट पाईप टाकले आहेत. त्यावर गावातील नागरिक दरवर्षी सिमेंटच्या बॅगमध्ये रेती भरून बॅग पाईपवर ठेवतात. अशा पद्धतीने पुलावरून उतरले जाते. मात्र दुचाकी किंवा चारचाकी नेणे अशक्य होते.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेDevrao Holiदेवराव होळी