शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

राजोलीवासीयांनी अडविले खासदार व आमदारांचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:36 IST

कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देअर्धवट पुलाने रहदारीस अडथळा : पाच कोटी निधी देण्याचे खासदारांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : कठाणी नदीवरील पूल अर्धवट असल्याने राजोलीवासीयांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. ही बाब खासदारांच्या लक्षात आणून देण्यासाठी राजोलीवासीयांनी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचे वाहन अडवून पुलाची पाहणी करण्याची मागणी केली. नागरिकांच्या मागण्यांना मान देत आमदार व खासदारांनी पुलाची पाहणी केली. या पुलाच्या पूर्ण बांधकामासाठी पाच कोटी रूपये उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन दिले.खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी हे रविवारी धानोरा येथील भारतीय जनता पार्टीच्या मंडळ कार्यकर्ता प्रशिक्षणाला गेले होते. आमदार व खासदार आल्याची माहिती कळताच पंचायत समिती सदस्य महागू वाडगुरे, माजी सरपंच लाला गेडाम, ग्रामसभा सदस्य मनोहर गुरनुले यांच्या नेतृत्वात राजोलीवासीयांनी धानोरा गाठले. आमदार व खासदार यांना घेराव घालून पुलाच्या गंभीर स्थितीबाबत अवगत केले. प्रत्यक्ष पुलाची पाहणी केल्याशिवाय नागरिकांच्या समस्या लक्षात येणार नाही, ही बाब राजोलीवासीयांनी खासदारांना पटवून दिली. प्रत्यक्ष पुलाची पाहणी करण्याची मागणी केली.त्याचबरोबर पूल बांधकामासाठी निधी देण्याबाबत निवेदनही सादर केले. खासदार व आमदारांनी प्रत्यक्ष नदीकाठी जाऊन पुलाची पाहणी केली. पूल अर्धवट असल्याने विद्यार्थी व नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचे दिसून आले. समस्येची गंभीरता लक्षात घेऊन पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले.अशी आहे कठाणी नदीवरील पुलाची दयनीय स्थितीधानोरा तालुकास्थळापासून ८ किमी अंतरावर असलेल्या राजोली येथील कठाणी नदीवर २०१५ साली बांधलेला पूल अर्धवट आहे. या पुलामुळे राजोलीवासीयांना धानोरा येथे जाण्यासाठी ५ किमीचे अंतर कमी झाले. अन्यथा नागरिकांना नवरगाव-सोडे मार्गे यावे लागत होते. कंत्राटदाराने पूल बांधताना तो अगदी नदीच्या काठापर्यंत बांधणे आवश्यक होते. मात्र काठापर्यंत पूल बांधला नाही. पुलाजवळील पिचिंग व्यवस्थित केली नाही. परिणामी काठाजवळील माती वाहून गेली. त्याचबरोबर दरवर्षी नदीकाठाचा विस्तार होत असल्याने पूल व नदीचे काठ यामध्ये जवळपास आता ५० फुटांचे अंतर पडले आहे. पूल व नदीची पातळी यामध्ये खड्डा निर्माण झाला आहे. पाऊस पडून नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर ५० फुटाच्या अंतरात पाणी राहते. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद राहते. पूल ते नदीपात्र जवळपास १० फूट अंतर आहे. प्रशासनाने तीन फूट उंचीचे सिमेंट पाईप टाकले आहेत. त्यावर गावातील नागरिक दरवर्षी सिमेंटच्या बॅगमध्ये रेती भरून बॅग पाईपवर ठेवतात. अशा पद्धतीने पुलावरून उतरले जाते. मात्र दुचाकी किंवा चारचाकी नेणे अशक्य होते.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेDevrao Holiदेवराव होळी