शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य मार्गावर वाहनांचे बस्तान

By admin | Updated: June 7, 2015 02:00 IST

शहरातील मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला खासगी प्रवासी वाहने तासणतास उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा

आरमोरी वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : अपघाताची शक्यता बळावलीआरमोरी : शहरातील मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला खासगी प्रवासी वाहने तासणतास उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असून अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. मात्र याकडे शहर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.आरमोरी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहरातून ब्रह्मपुरी, नागपूर, देसाईगंज व गडचिरोलीकडे जाता येत असल्याने मुख्य मार्गावर नेहमीच चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ राहते. शहरात रस्ता दुभाजक नसल्याने बहुतांश वाहने रस्त्याच्या मधूनच ये-जा करतात. बाजुला दुकानदारांनी अतिक्रमण करून जागा बळकाविली आहे. तर दुसरीकडे प्रवासी वाहतूक करणारे काळीपिवळी, टॅक्सी वाहने याच ठिकाणी ठेऊन प्रवासी गोळा करतात. सामान घेऊन येणारे ट्रकही रस्त्याच्या बाजुला उभे करून मालाची उचल केल्या जाते. तासणतास ही वाहने रस्त्याच्या बाजुला राहत असल्याने विशेषकरून पायदळ जाणाऱ्या व सायकलस्वारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी एका वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र वाहतूक पोलीस नेमकी कुठली वाहतूक नियंत्रित करते, याचा पत्ता लागत नाही. शहरातील बसस्थानकाजवळ नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलीस असणे गरजेचे असतानाही वाहतूक पोलिसांचे मात्र दर्शनच लाभत नाही. रस्त्याच्या बाजुला वाहने उभे करून प्रवासी भरले जात असल्याने याला वाहतूक पोलिसाचेच अभय असल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांचा धाक नसल्याने वाहनधारकांची मनमानी वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)