शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:29 IST

सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये बराच अंतर पडल्याने भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्यांचे बजेट कोलमडले : वाढत्या तापमानाने आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये बराच अंतर पडल्याने भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.गडचिरोली येथील १२ मे रोजी रविवार भरलेल्या आठवडी बाजारात अनेक प्रकारच्या भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून आले. जिल्हा मुख्यालयातील बाजारपेठेत दर रविवारी तालुक्यासह चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, धानोरा यासह अन्य तालुक्यातून भाजीपाल्याची आवक होते. तरीसुद्धा रविवारी भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. अनेक बाजारपेठांमध्ये शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी नेतात. सध्या लग्न समारंभाची धामधूम आहे. भाजीपाल्याची आवक बाजारात बºयापैकी होत असली तरी मागणी अधिक असल्याने बाजारपेठेत वस्तू टिकून राहत नाही. त्यामुळे रविवारच्या बाजारात विविध वस्तूंचे दर वाढल्याचे दिसून आले. अनेक ग्राहकांनी किलो ऐवजी अर्धा किलो वस्तूवरच समाधान मानले.मेथी, पालक, चवळीमाट व इतर प्रकारच्या भाज्या या बाजारात अत्यल्प प्रमाणात विक्रीसाठी आल्या होत्या. त्यामुळे या पालेभाज्यांचेही दर विक्रेत्यांनी वाढविल्याचे दिसून आले. भाजीपाल्यापेक्षा ग्राहकांचा आंबे खरेदीवर अधिक भर होता.असे होते गडचिरोलीच्या बाजारात भाजीपाल्याचे दरआठवडाभरापूर्वी पालेभाज्या व फळभाज्यांचे दर स्थिर होते. परंतु १२ मे रोजी गडचिरोलीच्या आठवडी बाजारात विविध वस्तूंची दरवाढ झाल्याचे दिसून आले. उत्तम दर्जाचे टमाटर ३० रूपये प्रति किलो, बटाटे २० रूपये प्रति किलो, मिरची २० रूपये पाव, कांदे २० रूपये प्रति किलो, कोथिंबीर ३० ते ४० रूपये पाव, कारले १५ ते २० रूपये पाव, भेंडी २० रूपये प्रति किलो, लवकी २० रूपये प्रति नग, फुल कोबी १० रूपये पाव, फणस १० रूपये पाव, लसून ३० ते ४० रूपये पाव याप्रमाणे विकले जात होते. याशिवाय बाजारात आंब्याची अत्यल्प आवक असल्याने ७० ते १०० रूपये प्रति किलो दराने विक्री केली जात होती. या भाववाढीचा आर्थिक फटका ग्राहकांना बसला. सध्या लग्नसमारंभाचे दिवस असल्याने तसेच जिल्ह्यात वादळी पाऊस होत असल्याने भाजीपाल्याच्या आवकीवर परिणाम होत आहे. याचेच कारण म्हणून प्रचंड भाववाढ झाली. त्यामुळे खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला.

टॅग्स :vegetableभाज्या