शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

वेदांत मांडवे जिल्ह्यात पहिला

By admin | Updated: May 28, 2015 01:02 IST

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) चा गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे.

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) चा गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे. शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोलीचा वेदांत दामोधर मांडवे हा ९२.६१ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून पहिला आला आहे. याच महाविद्यालयातून पियुष किरंगे हा ९०.९२ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून दुसरा आला आहे. तर कला शाखेतून शिवाजी महाविद्यालय गडचिरोलीचा महेश रविंद्र भांडेकर ८४.१५ टक्के गुण घेऊन कला शाखेतून जिल्ह्यात पहिला आला आहे.जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९४.६५ टक्के, कला शाखेचा निकाल ८४.८५ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९०.९१ टक्के, किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ८६.६२ टक्के लागला आहे.निकाल वाढला - शिक्षणाधिकारीगडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल यंदा चार टक्क्याहून अधिक वाढला आहे. या निकालात गुणवत्ता वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गेल्या वर्षभर शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालय व शाळांमध्ये दहावी, बारावीचा निकाल वाढविण्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले. कॉपीमुक्त परीक्षा हा ही उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर यंदाच्या परीक्षेत निकालाची टक्केवारी वाढली आहे. गतवर्षी १२ वीचा निकाल ८४.३८ टक्के होता. यंदा तो ८८.०४ टक्के झाला आहे. ही टक्केवारी ३.६६ टक्क्यांनी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी (माध्यामिक) उल्हास नरड यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. नागपूर विभागात गडचिरोलीचा निकाल सर्वात कमीनागपूर बोर्डात गडचिरोली जिल्हयाचा निकाल सर्वांत कमी ८८. ४ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकाल वाढला असला तरी नागपूर शिक्षण मंडळांतर्गत येत असलेल्या जिल्ह्याच्या तुलनेत हा निकाल सगळ्या शेवटच्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. त्यांनी तो टिकवून ठेवला नाही. त्यामुळे यंदा निकालात घसरण झाली, असल्याचे दिसून येते. दुर्गम भागातील आश्रमशाळांचे निकाल समाधानकारक नसल्याचे दिसून येते.निकालात मुली अव्वल: जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के मुलींचा निकाल ८७ टक्केगडचिरोली जिल्ह्यातून सात हजार ४१ मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी पाच हजार ८०० नऊ मुले उत्तीर्ण झालेत. मुलांची टक्केवारी ८२.५० आहे. जिल्ह्यातून सहा हजार १५६ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी पाच हजार ८०९ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींची टक्केवारी ८७ टक्के आहे.खासगीरित्या गडचिरोली जिल्ह्यातून ५३ मुले व ५८ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ४० मुले व २७ मुली उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ७३.६३ आहे.बाह्यविद्यार्थी म्हणून १५ मुले व ११ मुलींनी परीक्षा दिली. यापैकी कुणीही उत्तीर्ण झाले नाही. श्रेणी सुधार योजनेंतर्गत १५ मुले व तीन मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ मुले व दोन मुली उत्तीर्ण झालेत. त्यांचा निकाल ७७.७८ टक्के लागला आहे.लोकबिरादरी प्रकल्पाच्या हेमलकसा येथील कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही १०० टक्के निकाल दिला आहे.