शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वैरागडात रानडुकरांचा हैदोस वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:58 IST

धानपीक परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना वैरागड परिसरातील शेतांमध्ये रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. रानडुकरांकडून धान तसेच तूर पिकाचे नुकसान केले जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देनिसवलेल्या धानाचे नुकसान : बंदोबस्त करण्याकडे वन विभागाचे होत आहे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : धानपीक परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना वैरागड परिसरातील शेतांमध्ये रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. रानडुकरांकडून धान तसेच तूर पिकाचे नुकसान केले जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.वैरागड गावालगत असलेला किल्ला झाडाझुडूपांनी वेढला आहे. या झाडाझुडूपांमध्ये दिवसभर रानडुकरांचे वास्तव्य राहते. रात्रीच्या सुमारास किल्ल्यालगत असलेल्या शेतांमध्ये शिरून धानपिकाचे प्रचंड नुकसान केले जात आहे. सध्या धानपीक निसवण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत रानडुकरांचा कळप धानाच्या शेतीत शिरून शेतीचे प्रचंड नुकसान करीत आहे. हातात आले पीक रानडुकरांकडून नष्ट होताना पाहून शेतकºयांचे डोळे पाणावत आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. धानपीकाबरोबरच पारीवर असलेल्या तूर पिकाचेही नुकसान केले जात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे आवाहन वन विभागाच्या मार्फत केले जाते. मात्र हेच वन्यजीव आता शेतकºयांच्या जीवावर उठत आहेत. वन्यजीवांना ठार मारल्यास शिक्षा होत असल्याने शेतकरी रानडुकरांचा मारू सुध्दा शकत नाही. दुसरीकडे हेच रानडुकर शेतकºयांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे नेमके काय करावे, असा मोठा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.रबी पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. रबी पिकांचेही मोठे नुकसान रानडुकरांकडून केले जाते. अगदी पेरणीपासून तर पीक काढेपर्यंत शेतात जागल करावी लागत असल्याने अनेक शेतकरी रबी पिकाचे उत्पादन घेण्यास धजावत नाही. त्यामुळे एकाच फसलवर समाधान मानावे लागते. वन विभागाने डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांकडून होत असली तरी वन विभागाची याकडे दुर्लक्ष होत आहे.मदतीसाठी अतिशय जाचक अटीवन्यजीवांकडून शेतीचे किंवा मालमत्तेचे नुकसान होत असल्यास वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संबंधित शेतकºयांना आर्थिक मदत वन विभागाच्या मार्फत देण्याची तरतूद आहे. शेतीचे नुकसान झाल्यानंतर संबंधित शेतकरी वन विभागाकडे अर्ज करतात. वन विभागाच्या अधिकाºयांनी पंचनामा केल्यानंतर आर्थिक मदत निश्चित केली जाते. मात्र जेवढे नुकसान झाले, त्याच्या अर्धीही मदत दिली जात नाही. त्याचबरोबर पंचनाम्यापासून ते मदत मिळेपर्यंत बरीच प्रक्रिया करावी लागते. यामध्ये शेतकºयांचा बराच वेळ व पैसा खर्च होतो. परिणामी अनेक शेतकरी पिकाचे नुकसान होऊनही तक्रार करीत नाही. महिनाभरात आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी, असे शासनाचे निर्देश असले तरी वनरक्षक, क्षेत्र सहायक सदर प्रकरणे वर्षभराचा कालावधी उलटूनही निकाली काढत नाही.दिवसेंदिवस रानडुकरांची संख्या वाढत चालली आहे. रात्रीच्या सुमारास अनेक कळप बाहेर पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.