शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

वैरागड-मानापूर मार्गावर प्रशासनाचा खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:16 IST

शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीच्या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली.

लोकमतच्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग : मंगळवारी दुसऱ्यांदा मार्ग झाला बंद लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीच्या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. सकाळी शेतावर गेलेले मजूर पुलावरून पाणी वाहत असतानाच पूल ओलांडत होते. यावेळी त्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता लोकमतने वर्तविली होती. याबाबतचे छायाचित्रही प्रकाशित केले होते. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेऊन मंगळवारी या पुलावर प्रशासनाने खडा पहारा देत पुलावरून जाण्यास मनाई करीत होते. वैरागडनजीक वैलोचना नदी आहे. वैरागड येथील अनेक शेतकऱ्यांचे शेत नदी पलिकडे आहेत. त्यामुळे नदी ओलांडून गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. शनिवारी शेतकरी व शेतमजूर सकाळी रोवणीच्या कामासाठी गेले होते. मात्र दुपारी वैलोचना नदीच्या पाण्याची पातळी वाढली व पुलावरून पाणी चढण्यास सुरूवात झाली. आणखी पाणी वाढण्याचा धोका असल्याने रोवण्यासाठी गेलेले मजूर ३ वाजताच परतले. मात्र त्यावेळी पुलावरून पाणी वाहत होते. प्रशासनाच्या वतीने कोणतीही उपाययोजना केली नव्हती. त्यामुळे महिला मजूर जीव धोक्यात घालून स्वत:च पूल ओलांडत होत्या. याबाबतचे छायाचित्र लोकमतने १६ जुलै रोजी रविवारी प्रकाशित केले. मंगळवारीही रात्री जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे वैलोचना नदीच्या पाण्याची पातळी सकाळपासूनच वाढून दुपारी १२ वाजता पुलावरून पाणी चढले. याबाबतची माहिती आरमोरीचे तहसीलदार वाय. टी. धाईत यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. महसूल विभागाचे पथक पुलाजवळ पोहोचले. त्यांनी पुलावरून जाण्यास प्रतिबंध घातला. आकस्मिक स्थितीचा सामना करण्यासाठीही आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियोजन केले होते. यावेळी मंडळ अधिकारी व्ही. डी. घरत, तलाठी डी. एल. कुबडे, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, कोतवाल बंडू कांबळे हे पुलाजवळ ठाण मांडून होते. सायंकाळी पुन्हा पाऊस झाल्याने रात्री उशीरापर्यंत वैलोचना नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती.