शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

वैरागड-मानापूर मार्गावर प्रशासनाचा खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:16 IST

शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीच्या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली.

लोकमतच्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग : मंगळवारी दुसऱ्यांदा मार्ग झाला बंद लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीच्या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. सकाळी शेतावर गेलेले मजूर पुलावरून पाणी वाहत असतानाच पूल ओलांडत होते. यावेळी त्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता लोकमतने वर्तविली होती. याबाबतचे छायाचित्रही प्रकाशित केले होते. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेऊन मंगळवारी या पुलावर प्रशासनाने खडा पहारा देत पुलावरून जाण्यास मनाई करीत होते. वैरागडनजीक वैलोचना नदी आहे. वैरागड येथील अनेक शेतकऱ्यांचे शेत नदी पलिकडे आहेत. त्यामुळे नदी ओलांडून गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. शनिवारी शेतकरी व शेतमजूर सकाळी रोवणीच्या कामासाठी गेले होते. मात्र दुपारी वैलोचना नदीच्या पाण्याची पातळी वाढली व पुलावरून पाणी चढण्यास सुरूवात झाली. आणखी पाणी वाढण्याचा धोका असल्याने रोवण्यासाठी गेलेले मजूर ३ वाजताच परतले. मात्र त्यावेळी पुलावरून पाणी वाहत होते. प्रशासनाच्या वतीने कोणतीही उपाययोजना केली नव्हती. त्यामुळे महिला मजूर जीव धोक्यात घालून स्वत:च पूल ओलांडत होत्या. याबाबतचे छायाचित्र लोकमतने १६ जुलै रोजी रविवारी प्रकाशित केले. मंगळवारीही रात्री जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे वैलोचना नदीच्या पाण्याची पातळी सकाळपासूनच वाढून दुपारी १२ वाजता पुलावरून पाणी चढले. याबाबतची माहिती आरमोरीचे तहसीलदार वाय. टी. धाईत यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. महसूल विभागाचे पथक पुलाजवळ पोहोचले. त्यांनी पुलावरून जाण्यास प्रतिबंध घातला. आकस्मिक स्थितीचा सामना करण्यासाठीही आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियोजन केले होते. यावेळी मंडळ अधिकारी व्ही. डी. घरत, तलाठी डी. एल. कुबडे, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, कोतवाल बंडू कांबळे हे पुलाजवळ ठाण मांडून होते. सायंकाळी पुन्हा पाऊस झाल्याने रात्री उशीरापर्यंत वैलोचना नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती.