शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वैरागड ग्रामपंचायतवर महिलांनी काढला घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:09 IST

पाणींचाईने त्रस्त झालेल्या वैरागड येथील कुंभार मोहल्ल्यातील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणीटंचाई सोडवावी, अशी मागणी केली आहे. वैरागड येथे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. यावर्षी पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : नवीन पाणीपुरवठा योजना रखडली

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : पाणींचाईने त्रस्त झालेल्या वैरागड येथील कुंभार मोहल्ल्यातील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणीटंचाई सोडवावी, अशी मागणी केली आहे.वैरागड येथे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. यावर्षी पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. वैलोचना नदीपात्रात असलेल्या नळ योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातच शहरात पाण्याचे असमान वितरण होते. गावातील इंदिरानगर, गांधी चौक, कुंभार मोहल्ला या भागात पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांचा प्रशासनाविरोधात प्रचंड रोष आहे.जिल्हा परिषद सदस्यांच्या वादात वैरागडची पाणीपुरवठा योजना रखडली, असा नागरिकांचा आरोप आहे. केवळ श्रेय आपल्याला मिळावे, या मानसिकतेमुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वैरागड येथील गोरजाई डोहावर पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. परंतु काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या नसल्याने ही योजना पूर्ण झाली नाही. वैरागड हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. दरवर्षी गावाची लोकसंख्या वाढत आहे. तसेच वस्तीही वाढत आहे. त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना होणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी सुद्धा लक्ष देत नसल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा