शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

उपाहारगृहांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन

By admin | Updated: November 17, 2014 22:52 IST

गडचिरोली शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित

गडचिरोली : गडचिरोली शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. उपाहारगृह, हॉटेल तसेच टपऱ्यांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर वस्तूंची तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. उपहारगृह तसेच हॉटेलमधून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र अशा प्रकारची तपासणी जिल्ह्यात कुठेही होतांना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, आलापल्ली आदी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी अनेक उपाहारगृह, हॉटेल व हातटपऱ्या आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्येही हातठेले आहे. या सर्वच ठिकाणी खाद्यपदार्थाची उघड्यावरच विक्री केली जात असल्याची दिसून येते. उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थावर माशा घोंगावत असल्याचे बरेचदा आढळून येते. स्वच्छता राखण्यात न आल्याने अशी परिस्थिती उद्भवते. नियमांचे उलंघन होत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मात्र याबाबतीत कोणतीही कारवाई होत नसल्याने संबंधित हॉटेल, उपहारगृह मालक व हातठेलेधारकांची हिम्मत वाढत आहे. गडचिरोलीसह अन्य तालुका मुख्यालयी भरत असलेल्या बाजारातही उघड्यावच खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे. आठवडी बाजारात खाद्यपदार्थांची अनेक दुकाने अस्वच्छ जागेवर लावत असल्याचे दिसून येत आहे. बरेचशे दुकाने नालीच्या बाजूलाच थाटलेली असतात. या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जात नसल्याने उघड्यावरील पदार्थांवर रोग जंतू बसल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र असे असतांनाही उपहार गृह, हॉटेल तसेच हातठेलाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवित येत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अस्वच्छता कायम आहे. उघड्यावरील खाद्य पदार्थांच्या संदर्भात प्रशासनाने एक विशेष समिती गठित करून दरमहा हॉटेल, उपहार गृह व हातठेल्याच्या ठिकाणची तपासणी करावी, तसेच अस्वच्छता व पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा नसलेल्या हॉटेल, उपाहारगृह मालक व हातठेला धारकांवर कारवाई करावी. जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.