शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

उपाहारगृहांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन

By admin | Updated: November 17, 2014 22:52 IST

गडचिरोली शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित

गडचिरोली : गडचिरोली शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. उपाहारगृह, हॉटेल तसेच टपऱ्यांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर वस्तूंची तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. उपहारगृह तसेच हॉटेलमधून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र अशा प्रकारची तपासणी जिल्ह्यात कुठेही होतांना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, आलापल्ली आदी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी अनेक उपाहारगृह, हॉटेल व हातटपऱ्या आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्येही हातठेले आहे. या सर्वच ठिकाणी खाद्यपदार्थाची उघड्यावरच विक्री केली जात असल्याची दिसून येते. उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थावर माशा घोंगावत असल्याचे बरेचदा आढळून येते. स्वच्छता राखण्यात न आल्याने अशी परिस्थिती उद्भवते. नियमांचे उलंघन होत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मात्र याबाबतीत कोणतीही कारवाई होत नसल्याने संबंधित हॉटेल, उपहारगृह मालक व हातठेलेधारकांची हिम्मत वाढत आहे. गडचिरोलीसह अन्य तालुका मुख्यालयी भरत असलेल्या बाजारातही उघड्यावच खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे. आठवडी बाजारात खाद्यपदार्थांची अनेक दुकाने अस्वच्छ जागेवर लावत असल्याचे दिसून येत आहे. बरेचशे दुकाने नालीच्या बाजूलाच थाटलेली असतात. या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जात नसल्याने उघड्यावरील पदार्थांवर रोग जंतू बसल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र असे असतांनाही उपहार गृह, हॉटेल तसेच हातठेलाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवित येत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अस्वच्छता कायम आहे. उघड्यावरील खाद्य पदार्थांच्या संदर्भात प्रशासनाने एक विशेष समिती गठित करून दरमहा हॉटेल, उपहार गृह व हातठेल्याच्या ठिकाणची तपासणी करावी, तसेच अस्वच्छता व पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा नसलेल्या हॉटेल, उपाहारगृह मालक व हातठेला धारकांवर कारवाई करावी. जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.