शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

उपाहारगृहांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन

By admin | Updated: November 17, 2014 22:52 IST

गडचिरोली शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित

गडचिरोली : गडचिरोली शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. उपाहारगृह, हॉटेल तसेच टपऱ्यांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर वस्तूंची तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. उपहारगृह तसेच हॉटेलमधून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र अशा प्रकारची तपासणी जिल्ह्यात कुठेही होतांना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, आलापल्ली आदी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी अनेक उपाहारगृह, हॉटेल व हातटपऱ्या आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्येही हातठेले आहे. या सर्वच ठिकाणी खाद्यपदार्थाची उघड्यावरच विक्री केली जात असल्याची दिसून येते. उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थावर माशा घोंगावत असल्याचे बरेचदा आढळून येते. स्वच्छता राखण्यात न आल्याने अशी परिस्थिती उद्भवते. नियमांचे उलंघन होत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मात्र याबाबतीत कोणतीही कारवाई होत नसल्याने संबंधित हॉटेल, उपहारगृह मालक व हातठेलेधारकांची हिम्मत वाढत आहे. गडचिरोलीसह अन्य तालुका मुख्यालयी भरत असलेल्या बाजारातही उघड्यावच खाद्यपदार्थाची विक्री केली जात आहे. आठवडी बाजारात खाद्यपदार्थांची अनेक दुकाने अस्वच्छ जागेवर लावत असल्याचे दिसून येत आहे. बरेचशे दुकाने नालीच्या बाजूलाच थाटलेली असतात. या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जात नसल्याने उघड्यावरील पदार्थांवर रोग जंतू बसल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र असे असतांनाही उपहार गृह, हॉटेल तसेच हातठेलाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवित येत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अस्वच्छता कायम आहे. उघड्यावरील खाद्य पदार्थांच्या संदर्भात प्रशासनाने एक विशेष समिती गठित करून दरमहा हॉटेल, उपहार गृह व हातठेल्याच्या ठिकाणची तपासणी करावी, तसेच अस्वच्छता व पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा नसलेल्या हॉटेल, उपाहारगृह मालक व हातठेला धारकांवर कारवाई करावी. जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.