शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

पाणी काटकसरीने वापरा

By admin | Updated: January 31, 2015 01:37 IST

आज जरी पाणी मुबलक उपलब्ध होत असले तरी भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा,

गडचिरोली : आज जरी पाणी मुबलक उपलब्ध होत असले तरी भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले.भारत जल सप्ताहअंतर्गत जिल्हास्तरीय ‘हमारा जल हमारा जीवन’ या कार्यशाळेचे आयोजन २९ जानेवारी रोजी करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, कनिष्ठ भूवैज्ञानिक गुजर, रमेश भुरसे, उपविभागीय अभियंता बरडे, पळेगावकर आदी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना जीवन नाट यांनी भूजल पातळीत वाढ होण्यासाठी बंधारे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा सुद्धा उपलब्ध होते. शासनाने बंधारा बांधकामासाठी व त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केले. कनिष्ठ भूवैज्ञानिक गुजर यांनी जिल्ह्याची भूरचना, पाणलोट क्षेत्र, विहिरीची खोली, इन्व्हेल बोअर आदी बाबतची माहिती स्लाईटद्वारे सादर केली. प्रास्ताविक लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. ओरके यांनी केले. संचालन रोहयो संवर्ग विकास अधिकारी शालिकराम पडघन तर आभार शाखा अभियंता कुंभारे व दुमपेट्टीवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता घोडमारे, उप कार्यकारी अभियंता दिलीप जोग, घरतकर, झाडे, कंगाले यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेचा फायदा जलसंधारण कामांचे नियोजन करताना होणार आहे. (नगर प्रतिनिधी)