शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शिफारशीपेक्षा जास्त बियाणे वापरा

By admin | Updated: July 5, 2014 23:35 IST

जुलै महिन्याचे पाच दिवस लोटूनही पावसाचा पत्ता नाही. १० जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वाणांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

पाऊस लांबला : कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्लागडचिरोली : जुलै महिन्याचे पाच दिवस लोटूनही पावसाचा पत्ता नाही. १० जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वाणांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र १ लाख ६६ हजार हेक्टर एवढे आहे. यापैकी १ लाख ४९ हजार २६० हेक्टरवर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. २ जुलैपर्यंत केवळ ५ हजार ६६४ हेक्टरवर पऱ्हे टाकण्यात आले आहे. तर ८ हजार ५४८.८० हेक्टर क्षेत्रावर आवत्याची पेरणी करण्यात आली आहे. सोयाबीनच्या एकूण ६ हजार ३२० हेक्टरपैकी ३४१.९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कपासीच्या १२८० हेक्टरपैकी १९६ हेक्टरवर लागवड झाली आहे. एकूण क्षेत्राच्या फक्त ११ हजार २६४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण ६.७८ टक्के ऐवढे आहे. आजपर्यंत केवळ २९ टक्केच पाऊस पडला आहे. धानाचे पऱ्हे १० जुलैपर्यंत टाकल्यास उत्पादनावर फारसा प्रतीकूल परिणाम होणार नाही. मात्र १० जुलैनंतरही पाऊस न पडल्यास कमी कालावधीत येणाऱ्या धानपिकाच्या वाणांची निवड करावी. दरवर्षीच्या नियोजनापेक्षा बियाणांचा वापर जास्त करावा. ज्या शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले आहेत. पाऊस न पडल्यामुळे बियाण्यांची उगमक्षमता कमी होईल. त्याचबरोबर काही धानाची रोपे करपण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त पऱ्हे टाकावे, जेणेकरून रोवणीच्या वेळेवर रोपे कमी पडणार नाहीत. उशिरा पेरणी केलेल्या धान रोपांची मुळे रोवणीपूर्वी क्लोरोपायरीफॉस २० टक्के, ईसी १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या मिश्रणात बुडवावी, त्यानंतर रोवणी करावी. रोवणीनंतर १० ते २० दिवसांनी याच मिश्रणाची फवारणी करावी. जेणेकरून गादमाशी, पाने गुंडाळणारी अळी यापासून संरक्षण करता येईल. ८ जून ते १५ जून या कालावधीत उशीरा येणाऱ्या वाणांची लागवड केली गेली असेल तर अशा शेतकऱ्यांना १० ते २० जुलै या कालावधीत रोवणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. मात्र पऱ्हे टाकले आहेत अशांनी सायंकाळी धारीने पाणी द्यावे. १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास ज्या जमिनीत कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. अशा शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सुर्यफूल, तीळ या पिकांची लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांकडे ओलीताचे सोय आहे. अशा शेतकऱ्यांनी रोवणी सुरूवात करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (नगर प्रतिनिधी)