शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

धान शेतीत हिरवळीच्या खतांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST

भिवापूर येथे मार्गदर्शनप्रसंगी शेतकरी बंडू कुनघाडकर, संघपाल कुनघाडकर, राकेश गव्हारे, प्रकाश मेश्राम उपस्थित होते. कमी कालावधीत येणाऱ्या हिरवळीच्या वनस्पतींची ...

भिवापूर येथे मार्गदर्शनप्रसंगी शेतकरी बंडू कुनघाडकर, संघपाल कुनघाडकर, राकेश गव्हारे, प्रकाश मेश्राम उपस्थित होते.

कमी कालावधीत येणाऱ्या हिरवळीच्या वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. ही झाडे फुलोरा अवस्थेत आल्यानंतर, पाने, फांद्या व पडलेला पालापाचाेळा शेतात पसरवून चिखलणीदरम्यान गाडून घेतला जाताे. हिरवळीच्या खतांमध्ये ढेंचा (सिसबेना अक्युल्टा), साेनबाेरू (क्राेटालारिया ज्यंसी) आदी वनस्पतींसह चवळी (विगना कटजंग) बस्सीम गवत (ट्रायकाेफाेलियम ॲलेक्झांड्रम) सेनजी (मेलिओथस परविफलाेरा) यांचा समावेश हाेताे. खरीप हंगामात पाऊस पडल्यानंतर, हिरवळीच्या खतांच्या बिया बांध्यामध्ये पेरल्या जातात. या पिकाची लागवड करताना, विशेष मशागतीची आवश्यकता पडत नाही, तरी जमिनीची नांगरणी व वखरणी करावी, पेरणी करताना जमिनीत योग्य ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकाची उगवण व वाढ जोमाने होते. पीक लागवडीसाठी स्फुरदयुक्त खते द्यावीत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संजय गंगावणे, प्रज्ज्वल जेनेकर, कार्तिक भेलावे आदी विद्यार्थी उपस्थित हाेते.

बाॅक्स

हिरवळीची खते गाडण्याची याेग्य वेळ

हिरवळीच्या खतांमुळे पीक जाेमात येते. त्यामुळे ही पिके याेग्य वेळी जमिनीत गाडणे आवश्यक आहे. ही पिके ६ ते ८ आठवड्यांत फुलोऱ्यावर येतात. तेव्हा चिखलणीच्या वेळी ती जमिनीत गाडावी. सोनबोरूसारखे पीक जमिनीत गाडल्याने नत्राचे स्थिरीकरण हाेते, तसेच धानाच्या उत्पन्नात १२ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ हाेऊ शकते.

बाॅक्स

हिरवळींच्या खताचे फायदे

हिरवळीच्या खतांमुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडून सूक्ष्म जीवजंतूची हालचाल वाढते. जमिनीचे आराेग्य व पाेत सुधारताे. जमिनीची धूप कमी हाेते. जमिनीची सच्छिद्रता वाढून पावसाचे पाणी जमिनीत अधिक मुरण्यास मदत हाेते. जमिनीत अन्नद्रव्ये साठवली जातात. जमिनीत नत्राचे प्रमाण वाढते, तसेच स्फुरद, पालाश, कॅल्शिअम व इतर अन्नद्रव्ये पिकांना काही प्रमाणात मिळतात आदी फायदे हिरवळींच्या खताचे आहेत.