शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

गोवऱ्यांसाठी बसस्थानकाचा वापर

By admin | Updated: June 13, 2014 00:07 IST

प्रवाशांचे उन्ह, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी बस थांबा तिथे बसस्थानक राज्य परिवहन महामंडळातर्फे योजना राबविली जात आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक बसथांब्यावर बसस्थानकाच्या

गडचिरोली : प्रवाशांचे उन्ह, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी बस थांबा तिथे बसस्थानक राज्य परिवहन महामंडळातर्फे योजना राबविली जात आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक बसथांब्यावर बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु बसस्थानकाच्या इमारतीचा वापर प्रवाशांसाठी कमी तर खासगी व्यावसायिक व बसस्थानक गावात असल्यास त्याचा वापर गोवऱ्या, सरपण यासह घरातील अडगळीतील वस्तू ठेवण्यासाठी केला जात असल्याचे अमिर्झा येथील बसस्थानकावरून दिसून येत आहे. तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या अमिर्झा येथील अमिर्झा-दिभणा मार्गावरील बसस्थानकावर गोवऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय बसस्थानक जागोजागी तुटलेले असल्याने फरशीवर जागोजागी खड्डे पडले आहेत. प्लॉस्टर खोदकाम केल्याप्रमाणे व्यक्तीगत नावे लिहून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेले बसस्थानक दूरवस्थेत आहे. बसस्थानकात स्वच्छता ठेवणे ही प्रवाशांची जबाबदारी तर असते शिवाय ग्रामपंचायत व गावातील नागरिकांचीही जबाबदारी असते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने बसस्थानकात होत असलेल्या खासगी वस्तू ठेवण्याच्या वापराबद्दल मौन बाळगून आहेत. एकूणच अमिर्झा येथील बसस्थानकात घाणीचे साम्राज्य असून प्रवाशी बसस्थानकासा जाण्यास धजावत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी खासगी पानटपऱ्या तसेच व्यावसायिकांच्या चबुतऱ्यावर किंवा ओट्यांवर बसतात. (शहर प्रतिनिधी)