शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उद्योग उभारणीसाठी पैशापेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:44 IST

बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले.

ठळक मुद्देगिरीधर गांधी यांचे प्रतिपादन : जिल्हा बिझनेस समिट कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले.गडचिरोली येथील गोंडवन कला दालन येथे रविवारी गडचिरोली जिल्हा बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, चंद्रपूरचे मधुसूधन रूंगटा, गडचिरोली जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक पाटील, उद्योग निती फाऊंडेशन चंद्रपूरचे संस्थापक अविनाश टीपरे, आरसेटीचे समन्वयक काटकर, एव्हीजी गोट फार्मच्या अरूणा म्हरस्कोल्हे, प्रदीप लाड, चंद्रपूरचे नितीन चनकरवार, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक जाटव, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनील कुनघाडकर, चामोर्शी पंचायत समितीचे सभापती आनंद भांडेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार आदी मान्यवर उपस्थित होेते.पुढे मार्गदर्शन करताना गिरीधर गांधी म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी अतीशय चांगले वातावरण व संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणी असलेल्या जंगलावर आधारित अनेक उद्योग स्थापन करता येतात. येथील वनौषधी जगप्रसिद्ध आहे. सदर वनौषधी स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून गोळा करून ती देशातील नामांकित कंपन्यांना विकता येते. या वनौषधीवर प्राथमिक प्रक्रिया करणारे उद्योग गडचिरोली जिल्ह्यात उभारल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. बँकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध आहे. सदर पैसा बँकांना कर्जातच गुंतवावा लागतो. त्यामुळे त्या ग्राहकांच्या शोधात आहेत. नागरिकांचा पैसा बँकेत पडून राहिल्याने बँकांना आपल्या ग्राहकांना व्याज भरून द्यावे लागत आहे. या संधीचा फायदा नवीन उद्योजकांनी उचलावा. नवीन व्यवसाय करू इच्छीनाºया व्यक्तीला विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशन मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तयार असल्याचे प्रतिपादन केले.खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले केंद्र व राज्यातील सरकारने उद्योगांना चालना देण्याचे धोरण अवलंबीले आहे. त्यामुळे उद्योगामध्ये चैतण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्योगांना चालना देण्यासाठीच शासनाने मुद्रा योजना सुरू केली आहे. नागरिकांना स्वत:चा उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होत आहे. असे मार्गदर्शन केले.जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम दर महिन्यातून किमान एकदा आयोजित करावे असे मार्गदर्शन केले आहे.उद्योजकांच्या समस्यांचे समाधानया कार्यक्रमादरम्यान उद्योग स्थापन इच्छिणाºया नागरिकांकडून अर्ज भरून मागण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांनी मार्गदर्शनकर्त्यांना प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. १०० दिवसांत १०० उद्योग स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.