शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उद्योग उभारणीसाठी पैशापेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:44 IST

बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले.

ठळक मुद्देगिरीधर गांधी यांचे प्रतिपादन : जिल्हा बिझनेस समिट कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले.गडचिरोली येथील गोंडवन कला दालन येथे रविवारी गडचिरोली जिल्हा बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, चंद्रपूरचे मधुसूधन रूंगटा, गडचिरोली जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक पाटील, उद्योग निती फाऊंडेशन चंद्रपूरचे संस्थापक अविनाश टीपरे, आरसेटीचे समन्वयक काटकर, एव्हीजी गोट फार्मच्या अरूणा म्हरस्कोल्हे, प्रदीप लाड, चंद्रपूरचे नितीन चनकरवार, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक जाटव, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनील कुनघाडकर, चामोर्शी पंचायत समितीचे सभापती आनंद भांडेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार आदी मान्यवर उपस्थित होेते.पुढे मार्गदर्शन करताना गिरीधर गांधी म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी अतीशय चांगले वातावरण व संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणी असलेल्या जंगलावर आधारित अनेक उद्योग स्थापन करता येतात. येथील वनौषधी जगप्रसिद्ध आहे. सदर वनौषधी स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून गोळा करून ती देशातील नामांकित कंपन्यांना विकता येते. या वनौषधीवर प्राथमिक प्रक्रिया करणारे उद्योग गडचिरोली जिल्ह्यात उभारल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. बँकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध आहे. सदर पैसा बँकांना कर्जातच गुंतवावा लागतो. त्यामुळे त्या ग्राहकांच्या शोधात आहेत. नागरिकांचा पैसा बँकेत पडून राहिल्याने बँकांना आपल्या ग्राहकांना व्याज भरून द्यावे लागत आहे. या संधीचा फायदा नवीन उद्योजकांनी उचलावा. नवीन व्यवसाय करू इच्छीनाºया व्यक्तीला विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशन मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तयार असल्याचे प्रतिपादन केले.खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले केंद्र व राज्यातील सरकारने उद्योगांना चालना देण्याचे धोरण अवलंबीले आहे. त्यामुळे उद्योगामध्ये चैतण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्योगांना चालना देण्यासाठीच शासनाने मुद्रा योजना सुरू केली आहे. नागरिकांना स्वत:चा उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होत आहे. असे मार्गदर्शन केले.जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम दर महिन्यातून किमान एकदा आयोजित करावे असे मार्गदर्शन केले आहे.उद्योजकांच्या समस्यांचे समाधानया कार्यक्रमादरम्यान उद्योग स्थापन इच्छिणाºया नागरिकांकडून अर्ज भरून मागण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांनी मार्गदर्शनकर्त्यांना प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. १०० दिवसांत १०० उद्योग स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.