शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग उभारणीसाठी पैशापेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:44 IST

बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले.

ठळक मुद्देगिरीधर गांधी यांचे प्रतिपादन : जिल्हा बिझनेस समिट कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले.गडचिरोली येथील गोंडवन कला दालन येथे रविवारी गडचिरोली जिल्हा बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, चंद्रपूरचे मधुसूधन रूंगटा, गडचिरोली जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक पाटील, उद्योग निती फाऊंडेशन चंद्रपूरचे संस्थापक अविनाश टीपरे, आरसेटीचे समन्वयक काटकर, एव्हीजी गोट फार्मच्या अरूणा म्हरस्कोल्हे, प्रदीप लाड, चंद्रपूरचे नितीन चनकरवार, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक जाटव, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनील कुनघाडकर, चामोर्शी पंचायत समितीचे सभापती आनंद भांडेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार आदी मान्यवर उपस्थित होेते.पुढे मार्गदर्शन करताना गिरीधर गांधी म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी अतीशय चांगले वातावरण व संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणी असलेल्या जंगलावर आधारित अनेक उद्योग स्थापन करता येतात. येथील वनौषधी जगप्रसिद्ध आहे. सदर वनौषधी स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून गोळा करून ती देशातील नामांकित कंपन्यांना विकता येते. या वनौषधीवर प्राथमिक प्रक्रिया करणारे उद्योग गडचिरोली जिल्ह्यात उभारल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. बँकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध आहे. सदर पैसा बँकांना कर्जातच गुंतवावा लागतो. त्यामुळे त्या ग्राहकांच्या शोधात आहेत. नागरिकांचा पैसा बँकेत पडून राहिल्याने बँकांना आपल्या ग्राहकांना व्याज भरून द्यावे लागत आहे. या संधीचा फायदा नवीन उद्योजकांनी उचलावा. नवीन व्यवसाय करू इच्छीनाºया व्यक्तीला विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशन मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तयार असल्याचे प्रतिपादन केले.खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले केंद्र व राज्यातील सरकारने उद्योगांना चालना देण्याचे धोरण अवलंबीले आहे. त्यामुळे उद्योगामध्ये चैतण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्योगांना चालना देण्यासाठीच शासनाने मुद्रा योजना सुरू केली आहे. नागरिकांना स्वत:चा उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होत आहे. असे मार्गदर्शन केले.जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम दर महिन्यातून किमान एकदा आयोजित करावे असे मार्गदर्शन केले आहे.उद्योजकांच्या समस्यांचे समाधानया कार्यक्रमादरम्यान उद्योग स्थापन इच्छिणाºया नागरिकांकडून अर्ज भरून मागण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांनी मार्गदर्शनकर्त्यांना प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. १०० दिवसांत १०० उद्योग स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.