शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

उराडी धान खरेदी केंद्र बंद

By admin | Updated: March 21, 2015 01:51 IST

तालुक्यातील उराडी येथील सरकारी धान खरेदी केंद्रात बारदाणा नसल्याने हे केंद्र महिनाभरापासून बंद आहे.

कुरखेडा : तालुक्यातील उराडी येथील सरकारी धान खरेदी केंद्रात बारदाणा नसल्याने हे केंद्र महिनाभरापासून बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना पडेल भावाने खासगी केंद्रांवर धान विकावा लागत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.उराडी येथे आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र आहे. परंतु या केंद्रावर बारदाणाच उपलब्ध नसल्याने हे केंद्र महिनाभरापासून बंद आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेले सुमारे ५०० क्विंटल धान पडून आहे. आठवडाभरापूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने बऱ्याच धानाची नासाडीही झाली. शेतकरी धानाचे वजन करण्याची विनंती करतात. मात्र संबंधित कर्मचारी बारदाणा नसल्याचे कारण पुढे करुन वजन करण्यास नकार देतात. याबाबत आरमोरी येथील संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास तेही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उराडी येथील केंद्र बंद असल्याने गरजू शेतकऱ्यांना देसाईगंज येथे धान न्यावे लागत आहेत. परंतु तेथे उच्च प्रतीच्या धानाला केवळ १७५० रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे. सरकारी धान खरेदी केंद्रापेक्षा हा भाव १०० रुपयांनी कमी आहे. शिवाय वाहतुकीसाठी येणारा खर्च वेगळाच. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी सहकारी संस्था व बँकेकडून कर्ज घेतले होते. शून्य टक्के व्याजदराने कर्जाची परतफेड करावयाची झाल्यास ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. परंतु आता मार्च महिना संपण्यास अवघे १० दिवस शिल्लक असताना खरेदी केंद्र सुरु न झाल्याने कर्ज फेडावे कसे, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)