शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्य प्रशिक्षणाचा शिक्षकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:21 IST

एनसीईआरटीने दिलेले विद्यार्थी गुणवत्तेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे उद्बोधन कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. मात्र डीआयईसीपीडी यांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात न आल्याने सिरोंचा व कोरची तालुक्यातील शिक्षकांना त्रास सहन करावा लागला.

ठळक मुद्देविमाशिसंचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : स्थळ चुकीचे दिल्याने २०० किमीची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एनसीईआरटीने दिलेले विद्यार्थी गुणवत्तेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे उद्बोधन कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. मात्र डीआयईसीपीडी यांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात न आल्याने सिरोंचा व कोरची तालुक्यातील शिक्षकांना त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारचे नियोजन शून्य प्रशिक्षण यापुढे घेऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.सदर निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक रमेश उचे यांनी स्वीकारले. यावेळी विमाशिसंचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, सुरेंद्र मामिडवार, शेमदेव चापले, रवींद्र बांबोळे, यशवंत रायपुरे, रेवनाथ लांजेवार, दिगांबर कोटगले, मंगेश भैसारे आदींसह शिक्षक उपस्थित होते.सदर निवेदन हे आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना शिक्षणाधिकाºयांमार्फत पाठविण्यात आले आहे. निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, मानव संसाधन विकास मंत्रालय व एनसीईआरटी यांच्याद्वारे इयत्तानिहाय निश्चित करून दिलेल्या क्षमतांमध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक वाढविण्याच्या उद्देशाने विद्या प्राधिकरण पुणे यांच्या मार्फत राज्यभरात एकाचवेळी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस करण्यात आले. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व सामजिकशास्त्राचे अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे सहा गटांमध्ये एका दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी डीआयईसीपीडी यांच्या प्राचार्यांकडे शासनाने सोपविली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र निश्चित करताना भौगोलिक परिस्थितीचा विचार करण्यात आला नाही, हे स्पष्ट होते, असे विमाशिसंने म्हटले आहे.आरमोरी प्रशिक्षण केंद्रावर आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची या तालुक्यातील शाळांचा समावेश करण्यात आला होता. यात आरमोरीपासून कोरची तालुक्याचे अंतर जवळपास १०० किमी आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील शिक्षकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. अहेरी केंद्रावर प्रशिक्षणासाठी येणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील शिक्षकांना १५० किमीचे अंतर गाठून शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. काही प्रशिक्षण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. प्रत्येक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना जेवणाचे डबे सोबत आणण्याच्या सूचना पत्रान्वये देण्यात आल्या होत्या, असे म्हटले आहे. आर्थिक तरतूद नसताना प्रशिक्षण का घेण्यात आले, असा सवाल विमाशिसंने केला आहे.