शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

नियोजनशून्य प्रशिक्षणाचा शिक्षकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:21 IST

एनसीईआरटीने दिलेले विद्यार्थी गुणवत्तेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे उद्बोधन कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. मात्र डीआयईसीपीडी यांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात न आल्याने सिरोंचा व कोरची तालुक्यातील शिक्षकांना त्रास सहन करावा लागला.

ठळक मुद्देविमाशिसंचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : स्थळ चुकीचे दिल्याने २०० किमीची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एनसीईआरटीने दिलेले विद्यार्थी गुणवत्तेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे उद्बोधन कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. मात्र डीआयईसीपीडी यांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात न आल्याने सिरोंचा व कोरची तालुक्यातील शिक्षकांना त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारचे नियोजन शून्य प्रशिक्षण यापुढे घेऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.सदर निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक रमेश उचे यांनी स्वीकारले. यावेळी विमाशिसंचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, सुरेंद्र मामिडवार, शेमदेव चापले, रवींद्र बांबोळे, यशवंत रायपुरे, रेवनाथ लांजेवार, दिगांबर कोटगले, मंगेश भैसारे आदींसह शिक्षक उपस्थित होते.सदर निवेदन हे आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना शिक्षणाधिकाºयांमार्फत पाठविण्यात आले आहे. निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, मानव संसाधन विकास मंत्रालय व एनसीईआरटी यांच्याद्वारे इयत्तानिहाय निश्चित करून दिलेल्या क्षमतांमध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक वाढविण्याच्या उद्देशाने विद्या प्राधिकरण पुणे यांच्या मार्फत राज्यभरात एकाचवेळी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस करण्यात आले. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व सामजिकशास्त्राचे अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे सहा गटांमध्ये एका दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी डीआयईसीपीडी यांच्या प्राचार्यांकडे शासनाने सोपविली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र निश्चित करताना भौगोलिक परिस्थितीचा विचार करण्यात आला नाही, हे स्पष्ट होते, असे विमाशिसंने म्हटले आहे.आरमोरी प्रशिक्षण केंद्रावर आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची या तालुक्यातील शाळांचा समावेश करण्यात आला होता. यात आरमोरीपासून कोरची तालुक्याचे अंतर जवळपास १०० किमी आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील शिक्षकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. अहेरी केंद्रावर प्रशिक्षणासाठी येणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील शिक्षकांना १५० किमीचे अंतर गाठून शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. काही प्रशिक्षण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. प्रत्येक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना जेवणाचे डबे सोबत आणण्याच्या सूचना पत्रान्वये देण्यात आल्या होत्या, असे म्हटले आहे. आर्थिक तरतूद नसताना प्रशिक्षण का घेण्यात आले, असा सवाल विमाशिसंने केला आहे.