शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

...तोपर्यंत कृषीपंपांना होणार आता 24 तास वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फक्त ८ तासच वीजपुरवठा होणार, यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी धास्तावले होते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यातील धान उत्पादक व इतर शेतकऱ्यांना फक्त ८ तास वीज पुरवठा करण्याबाबत वीज कंपनीने काढलेला ५ जानेवारीचा आदेश शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर दुसऱ्याचदिवशी बदलविला. यावर तोडगा निघेपर्यंत २४ तास वीज देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फक्त ८ तासच वीजपुरवठा होणार, यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी धास्तावले होते. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ५ जानेवारीला तालुक्यातील कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी सुरेंद्रसिंह चंदेल, अविनाश गेडाम यांच्या नेतृत्वात देसाईगंज वीज वितरण कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. 

अन् संतप्त शेतकऱ्यांसमोर अधिकारी नरमले

-    महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ६ जानेवारीला लोडशेडिंग करून सकाळी ९ वाजता पुन्हा लाईट  सुरू केली. त्यामुळे सर्व शेतकरी संतप्त झाले. पुन्हा १२ वाजता महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. यावेळी शेतकऱ्यांनी वीज पुरवठा करायचा असेल, तर २४ तास करा, अन्यथा वीज देऊच नका, अशी भूमिका घेतली. -    शेवटी त्यांचा आक्रोश पाहून वीज कंपनीचे अधिकारी नरमले व त्यांनी या समस्येवर जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत २४ तासच वीज पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी सुखावले. यावेळी नंदू चावला, विकास प्रधान, कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके, चिंटू नाकाडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज