शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय होईपर्यंत महिलांचा संप कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:53 IST

मानधनवाढ कमिटीचे गठन केल्यानंतर या कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर आश्वासनही देण्यात आले.

ठळक मुद्देरमेशचंद्र दहिवडे यांची स्पष्टोक्ती : शासनाने शब्द न पाळल्याने अंगणवाडी महिला कर्मचारी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/एटापल्ली : मानधनवाढ कमिटीचे गठन केल्यानंतर या कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर आश्वासनही देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंगणवाडी महिला कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे या महिला कर्मचाºयांनी रस्त्यावर उतरून संप पुकारला आहे. मानधवाढीचा निर्णय होईपर्यंत कर्मचाºयांचा हा संप कायमच राहील, असे सी-टू संलग्नित अंगणवाडी कमिटी संघटनेचे राज्यध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी स्पष्ट केले आहे.अंगणवाडी महिलांच्या मानधनवाढी बाबतच्या विषयावर गडचिरोली व एटापल्ली येथे महिला कर्मचाºयांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. दहिवडे बोलत होते. गडचिरोली येथील मेळावा माया भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याला इंदूमती भांडारकर, भारती रामटेके, कार्तिक स्वामी कोवे, शालू बुर्रेवार, लता कडूकर, कुसूम नैताम, ज्योती कुद्रपवार, कुसूम नागोसे आदी उपस्थित होत्या.एटापल्ली येथील मेळावा गुलश शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रास्ताविक छाया कागदेलवार यांनी केले तर आभार राजश्री खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनुसया झाडे, मंगला मोहुर्ले, नीलिमा बेडके, उमा मेडीवार, सुमन गावडे, लिनीग्रेस केरकट्टा आदींनी सहकार्य केले.यावेळी बोलताना प्रा. दहिवडे म्हणाले, २० जुलै २०१६ ला गठित झालेल्या मनधनवाढ कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर १० जानेवारीला मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र मानधनवाढीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने ११ सप्टेंबरपासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर आहेत. अंगणवाडी महिलांच्या संपाकरिता अंगणवाडी महिला नव्हे तर शासनच जबाबदार आहे, असे रमेशचंद्र दहिवडे म्हणाले.