शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

निर्णय होईपर्यंत महिलांचा संप कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:53 IST

मानधनवाढ कमिटीचे गठन केल्यानंतर या कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर आश्वासनही देण्यात आले.

ठळक मुद्देरमेशचंद्र दहिवडे यांची स्पष्टोक्ती : शासनाने शब्द न पाळल्याने अंगणवाडी महिला कर्मचारी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/एटापल्ली : मानधनवाढ कमिटीचे गठन केल्यानंतर या कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर आश्वासनही देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंगणवाडी महिला कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे या महिला कर्मचाºयांनी रस्त्यावर उतरून संप पुकारला आहे. मानधवाढीचा निर्णय होईपर्यंत कर्मचाºयांचा हा संप कायमच राहील, असे सी-टू संलग्नित अंगणवाडी कमिटी संघटनेचे राज्यध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी स्पष्ट केले आहे.अंगणवाडी महिलांच्या मानधनवाढी बाबतच्या विषयावर गडचिरोली व एटापल्ली येथे महिला कर्मचाºयांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. दहिवडे बोलत होते. गडचिरोली येथील मेळावा माया भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याला इंदूमती भांडारकर, भारती रामटेके, कार्तिक स्वामी कोवे, शालू बुर्रेवार, लता कडूकर, कुसूम नैताम, ज्योती कुद्रपवार, कुसूम नागोसे आदी उपस्थित होत्या.एटापल्ली येथील मेळावा गुलश शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रास्ताविक छाया कागदेलवार यांनी केले तर आभार राजश्री खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनुसया झाडे, मंगला मोहुर्ले, नीलिमा बेडके, उमा मेडीवार, सुमन गावडे, लिनीग्रेस केरकट्टा आदींनी सहकार्य केले.यावेळी बोलताना प्रा. दहिवडे म्हणाले, २० जुलै २०१६ ला गठित झालेल्या मनधनवाढ कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर १० जानेवारीला मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र मानधनवाढीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने ११ सप्टेंबरपासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर आहेत. अंगणवाडी महिलांच्या संपाकरिता अंगणवाडी महिला नव्हे तर शासनच जबाबदार आहे, असे रमेशचंद्र दहिवडे म्हणाले.