शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
3
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
4
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
5
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
6
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
7
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
8
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
9
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
10
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
11
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
12
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
13
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
14
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
15
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
16
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
17
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
18
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
19
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
20
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश

निर्णय होईपर्यंत महिलांचा संप कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:53 IST

मानधनवाढ कमिटीचे गठन केल्यानंतर या कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर आश्वासनही देण्यात आले.

ठळक मुद्देरमेशचंद्र दहिवडे यांची स्पष्टोक्ती : शासनाने शब्द न पाळल्याने अंगणवाडी महिला कर्मचारी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/एटापल्ली : मानधनवाढ कमिटीचे गठन केल्यानंतर या कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर आश्वासनही देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंगणवाडी महिला कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे या महिला कर्मचाºयांनी रस्त्यावर उतरून संप पुकारला आहे. मानधवाढीचा निर्णय होईपर्यंत कर्मचाºयांचा हा संप कायमच राहील, असे सी-टू संलग्नित अंगणवाडी कमिटी संघटनेचे राज्यध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी स्पष्ट केले आहे.अंगणवाडी महिलांच्या मानधनवाढी बाबतच्या विषयावर गडचिरोली व एटापल्ली येथे महिला कर्मचाºयांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. दहिवडे बोलत होते. गडचिरोली येथील मेळावा माया भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याला इंदूमती भांडारकर, भारती रामटेके, कार्तिक स्वामी कोवे, शालू बुर्रेवार, लता कडूकर, कुसूम नैताम, ज्योती कुद्रपवार, कुसूम नागोसे आदी उपस्थित होत्या.एटापल्ली येथील मेळावा गुलश शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रास्ताविक छाया कागदेलवार यांनी केले तर आभार राजश्री खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनुसया झाडे, मंगला मोहुर्ले, नीलिमा बेडके, उमा मेडीवार, सुमन गावडे, लिनीग्रेस केरकट्टा आदींनी सहकार्य केले.यावेळी बोलताना प्रा. दहिवडे म्हणाले, २० जुलै २०१६ ला गठित झालेल्या मनधनवाढ कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर १० जानेवारीला मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र मानधनवाढीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने ११ सप्टेंबरपासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर आहेत. अंगणवाडी महिलांच्या संपाकरिता अंगणवाडी महिला नव्हे तर शासनच जबाबदार आहे, असे रमेशचंद्र दहिवडे म्हणाले.