शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: October 19, 2016 02:22 IST

केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात सध्या गडचिरोली शहरात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे.

वादंग : नव्याने आलेल्यांना संधी दिल्याचा परिणाम गडचिरोली : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात सध्या गडचिरोली शहरात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व नेतेही या वातावरणामुळे त्रस्त झाले असून पक्षात जुन्या लोकांचे ऐकून घेणारेच राहिलेले नाही, अशी खंत नाव न छापण्याच्या अटीवर एका नेत्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.गेले अनेक वर्ष विविध पक्ष व संघटना फिरून आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्षाने नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची व ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली व हे नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत, असे सांगितले. मात्र त्यांना अटी, शर्तीवर प्रवेश देऊ नये, अशी सूचना करण्यात आली होती, अशी माहिती या ज्येष्ठ नेत्याने लोकमतला दिली. मात्र पक्षात प्रवेश होताच खासदारांनी बैठक घेऊन याच लोकांकडे गडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या जुन्या नेत्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या काय, असा प्रश्न आता आमच्यासमोर पडला आहे. ज्या महिलेचे नाव नगराध्यक्ष पदासाठी पक्के करण्यात आले आहे. त्या नावावरही अनेकांना आक्षेप आहे. मात्र सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास खासदार, आमदारांना वेळ नाही. केवळ वरून निर्णय खालच्या कार्यकर्त्यावर लादले जात आहे. त्यामुळे खालचा कार्यकर्ता नगर परिषद निवडणुकीतच नाही तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत आपली शक्ती पक्षाला दाखवून देईल, याची जाणीव या लोकप्रतिनिधी ठेवावी, असा दमही कार्यकर्ते आता पक्ष नेतृत्वाला देऊ लागले आहे. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज मागितले. मात्र योगीता प्रमोद पिपरे यांनाच उमेदवारी निश्चित होणार आहे, असा दावाही या नेत्याने लोकमतशी बोलताना केला. एवढेच नव्हे तर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अम्ब्रीशराव आत्राम यांनाही गडचिरोली नगर पालिकेच्या निवडणुकीबाबत विश्वासात घेण्यात आलेले नाही, अशी माहितीही या नेत्याने दिली. एकूणच या जबाबदार आणि ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेमुळे पक्षाला आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)