शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

सोयीअभावी साठवण बंधारे निरूपयोगी

By admin | Updated: February 16, 2017 01:55 IST

जिल्हा परिषदेच्या सिंचर्न विभागाच्या वतीने ओढे व छोट्या नाल्यांवर साठवण बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे.

जि. प. सिंचन विभागाचे दुर्लक्ष : अनेक बंधाऱ्यांवर पाणी अडविण्याची व्यवस्था नाही गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सिंचर्न विभागाच्या वतीने ओढे व छोट्या नाल्यांवर साठवण बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे. अनेक बंधारे समतल रपटेयुक्त बनविले जात आहेत. काही बंधाऱ्यांवर पाणी सोडण्यासाठी दरवाज्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या बंधाऱ्यांवर दरवाजे अद्यापही न लावल्याने व येथे इतर अन्य सुविधा न पुरविल्याने साठवण बंधाऱ्यामध्ये पाणी साठून राहण्यास अडचणी येत आहेत. संपूर्ण पाणी जमिनीत जिरण्याऐवजी वाहून गेल्याने साठवण बंधारे निरूपयोगी ठरत आहेत. ओढे, नाल्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहावे, अधिकचे पाणी सहज वाहून जावे या हेतूने जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागामार्फत तालुक्यात अनेक ठिकाणी नाल्यांवर जवळपास दोन किमी अंतरावर साठवण बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. व दरवर्षी हे काम नित्यनेमाने सुरू आहे. जवळपास १४ लाख ६३ हजार ७१० रूपयांचा निधी एका साठवण बंधाऱ्याच्या निर्मितीवर खर्च केला जात आहे. परंतु ज्या बंधाऱ्याच्या ठिकाणी पाणी सोडण्यासाठी दरवाज्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा ठिकाणी अद्यापही लोखंडी दरवाजे पोहोचलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी एकही पाणी साचून राहिले नाही. यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण पाणी वाहून गेले. त्यामुळे साठवण बंधारा निर्मितीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. तालुक्यातील अमिर्झा परिसरातील अनेक नाल्यांवर साठवण बंधाऱ्या निर्मिती करण्यात आली. येथे या बंधाऱ्यांवर गेट देण्याची मागणी शेतकऱ्यांनी वारंवार जि. प. च्या सिंचाई विभागाकडे विशेषत: सिंचाई उपविभाग गडचिरोली यांच्याकडे केली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही तीव्र रोष व्यक्त होत आहे. साठवण बंधाऱ्या उद्देश अधिकाधिक पाणी जमिनीत मुरवणे व शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग होणे असा असला तरी याला हरताळ फासला जात आहे.