शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

सोयीअभावी साठवण बंधारे निरूपयोगी

By admin | Updated: February 16, 2017 01:55 IST

जिल्हा परिषदेच्या सिंचर्न विभागाच्या वतीने ओढे व छोट्या नाल्यांवर साठवण बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे.

जि. प. सिंचन विभागाचे दुर्लक्ष : अनेक बंधाऱ्यांवर पाणी अडविण्याची व्यवस्था नाही गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सिंचर्न विभागाच्या वतीने ओढे व छोट्या नाल्यांवर साठवण बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे. अनेक बंधारे समतल रपटेयुक्त बनविले जात आहेत. काही बंधाऱ्यांवर पाणी सोडण्यासाठी दरवाज्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या बंधाऱ्यांवर दरवाजे अद्यापही न लावल्याने व येथे इतर अन्य सुविधा न पुरविल्याने साठवण बंधाऱ्यामध्ये पाणी साठून राहण्यास अडचणी येत आहेत. संपूर्ण पाणी जमिनीत जिरण्याऐवजी वाहून गेल्याने साठवण बंधारे निरूपयोगी ठरत आहेत. ओढे, नाल्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहावे, अधिकचे पाणी सहज वाहून जावे या हेतूने जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागामार्फत तालुक्यात अनेक ठिकाणी नाल्यांवर जवळपास दोन किमी अंतरावर साठवण बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. व दरवर्षी हे काम नित्यनेमाने सुरू आहे. जवळपास १४ लाख ६३ हजार ७१० रूपयांचा निधी एका साठवण बंधाऱ्याच्या निर्मितीवर खर्च केला जात आहे. परंतु ज्या बंधाऱ्याच्या ठिकाणी पाणी सोडण्यासाठी दरवाज्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा ठिकाणी अद्यापही लोखंडी दरवाजे पोहोचलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी एकही पाणी साचून राहिले नाही. यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण पाणी वाहून गेले. त्यामुळे साठवण बंधारा निर्मितीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. तालुक्यातील अमिर्झा परिसरातील अनेक नाल्यांवर साठवण बंधाऱ्या निर्मिती करण्यात आली. येथे या बंधाऱ्यांवर गेट देण्याची मागणी शेतकऱ्यांनी वारंवार जि. प. च्या सिंचाई विभागाकडे विशेषत: सिंचाई उपविभाग गडचिरोली यांच्याकडे केली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही तीव्र रोष व्यक्त होत आहे. साठवण बंधाऱ्या उद्देश अधिकाधिक पाणी जमिनीत मुरवणे व शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग होणे असा असला तरी याला हरताळ फासला जात आहे.