शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोराईडमुक्त पाण्यासाठी आठ गावांत लागणार युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:43 IST

भूगर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असलेल्या आठ गावांतील पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासनाकडून फ्लोराईड रिमूव्हल युनिट लावले जाणार आहेत.

ठळक मुद्देशासन पुरविणार यंत्र : पाण्यासाठी आकारणार शुल्क, ग्रामपंचायतींना करावी लागणार देखभाल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भूगर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असलेल्या आठ गावांतील पाण्याच्या स्त्रोतातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी शासनाकडून फ्लोराईड रिमूव्हल युनिट लावले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना फ्लोराईडमुक्त पाणी मिळणार आहे. पहिल्यांदाच हा प्रयोग जिल्ह्यात केला जाणार आहे हे विशेष.भूगर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असेल तर ते पाणी पिण्यासाठी योग्य नसते. त्यातून हातापायांची हाडे वाकडी होऊन विविध आजार उद्भवतात. पण पिण्याच्या पाण्याचे दुसरे स्त्रोत नसल्यामुळे नाईलाजाने लोक ते पाणी पितात. मात्र आता त्यांना फ्लोराईडयुक्त पाण्यापासून मुक्ती मिळून शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.भूवैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालानुसार आरमोरी तालुक्यात पाटणवाडा, चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली, अहेरी तालुक्यातील कर्नेली, आंबेझरा, भामरागड तालुक्यातील झारेवाडा, धोडराज तसेच सिरोंचा तालुक्यातील गरकापेढा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे पोचमपल्ली व टेकडामोकला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुत्तापूर माल या आठ गावांमध्ये भूगर्भातील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण १.५ पीपीएम पेक्षा जास्त आढळले. याशिवाय इतर पाच गावांमधील पाण्याच्या स्त्रोतात फ्लोराईड आहे, मात्र त्याची मात्र कमी असल्याने तिथे शुद्धीकरण यंत्र लागणार नाही.विशेष म्हणजे हे यंत्र राज्य शासनच खरेदी करून देणार आहे. मात्र त्याची देखभाल ग्रामपंचायतीला करावी लागणार आहे. त्याची ग्रामपंचायतीची तयारी आहे का? संबंधित गावांमध्ये वीज पुरवठा उपलब्ध आहे का? यंत्र लावण्यासाठी किमान २०० चौरस फूट जागा उपलब्ध आहे का? आदी बाबींची तपासणी करून ग्रामपंचायतींमार्फत तसे प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने मागविले आहेत. सिरोंचा तालुक्यातील दोन गावे वगळता इतर गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत. हे शुद्ध पाणी गावकऱ्यांना पूर्णपणे फुकटात मिळणार नाही. त्यासाठी प्रतिलिटर काही पैसे मोजावे लागणार आहेत.जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाई नाही !यावर्षी जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाई जाणवणार नाही, असा अहवाल वरिष्ठ भूजल तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून पाणी टंचाईसंदर्भात कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. काही ठिकाणी हातपंप बंद आहेत. त्यांची दुरूस्ती सुरू असल्याचे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात पाणी टंचाई नाही. मात्र पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा वापर प्रत्येकाने जपून करावा. गावातील हातपंपांची देखभाल दुरूस्ती होऊन नियमितपणे तो चालू राहावा यासाठी संपूर्ण गावामिळून वार्षिक दोन हजार रुपये एवढे नाममात्र शुल्क भरण्याचीही गावकऱ्यांची तयारी नसते. त्यामुळे अडचणी जातात.- के.आर.घोडमारे, कार्यकारी अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. गडचिरोली