शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीच्या विठ्ठलरावांचे अनोखे गांधीप्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

विठ्ठलराव हे बालपणीच महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झाले. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचे गांधी प्रेम अजूनही तितकेच कायम आहे. आरमोरीत १९३५ साली जन्मलेल्या विठ्ठलराव यांचे मातृछत्र बालपणीच हरपले. त्यात वडीलसुद्धा देशप्रेमाने झपाटल्याने ते सैन्यदलात दाखल झाले.

ठळक मुद्देघरीच पेटीचरख्यावर तयार करतात माळ : सुताचे हार अर्पण करून वाहतात बापूंना श्रद्धांजली

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : आजपासून तब्बल १५० वर्षांपूर्वी गुजरात राज्याच्या पोरबंदर येथे जन्मलेल्या महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झालेले आरमोरी येथील विठ्ठलराव काशिनाथ गुुड्डेवार हे अद्यापही गांधी विचार कायम ठेवले आहे. महात्मा गांधी जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी गुड्डेवार हे स्वत:च आपल्या पेटी चरख्यावर सुतापासून हार तयार करतात. सदर सुताचे हार अर्पण करून श्रद्धांजली वाहतात. एकूणच गुड्डेवार यांचे अनोखे गांधी प्रेम अद्यापही कायम आहे.विठ्ठलराव हे बालपणीच महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झाले. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचे गांधी प्रेम अजूनही तितकेच कायम आहे. आरमोरीत १९३५ साली जन्मलेल्या विठ्ठलराव यांचे मातृछत्र बालपणीच हरपले. त्यात वडीलसुद्धा देशप्रेमाने झपाटल्याने ते सैन्यदलात दाखल झाले. परिणामी मोठ्या वडिलाने विठ्ठलरावांचे पालनपोषण केले. भारत स्वतंत्र होईपर्यंत विठ्ठलरावांचे बालपण पारतंत्र्यात गेले. विठ्ठलरावांच्या घरचे व आजूबाजूचे वातावरण भारत देशाप्रती अभिमान बाळगणारे होते. १९४२ चे ‘चले जाव आंदोलन’ व देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांचे व्यक्तीमत्व सर्वात केंद्रस्थानी होते. अशा या व्यक्तीमत्वांचे विचार चौफेर घुमू लागले. दरम्यान गांधी विचारांच्या फेऱ्यात विठ्ठलराव कसेकाय सापडले, जे आजही त्यातून बाहेर पडू शकले नाही. भविष्यात सुद्धा असेच गांधी प्रेम कायम राहणार, असा दुर्धम्य आशावाद विठ्ठलराव आपल्या बोलणातून व्यक्त करतात. विठ्ठलराव हे आजही गांधी विचाराने जीवन जगत आहेत. गांधीविषयी असलेला त्यांचा लढा व स्नेह इतरांना प्रेरणा देणारा असाच आहे.स्वच्छतेसह गांधींचे अनेक विचार आत्मसातविठ्ठलराव गुड्डेवार हे महात्मा गांधी यांना एक विचार मानतात. महात्मा गांधी यांची सर्वधर्म समभाव जपणारी प्रार्थना प्रत्येकाने आत्मसात करावी, असे ते आवर्जुन सांगतात. गांधीजींच्या जीवनातून प्रेरणा म्हणून विठ्ठलराव हे आजही खादी वस्त्र वापरतात. चरखा, खादी व गांधी यांचे अतुट समिकरण तयार झाले आहे. खादी म्हणजे सादे वस्त्र नाही तर ते सुद्धा एक विचार असल्याचे विठ्ठलराव सांगतात. साधी राहणी, मांस व्यर्ज व स्वच्छता हे तीन सुत्र विठ्ठलराव कायमपणे जपत आहेत.