शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

आरमोरीच्या विठ्ठलरावांचे अनोखे गांधीप्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

विठ्ठलराव हे बालपणीच महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झाले. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचे गांधी प्रेम अजूनही तितकेच कायम आहे. आरमोरीत १९३५ साली जन्मलेल्या विठ्ठलराव यांचे मातृछत्र बालपणीच हरपले. त्यात वडीलसुद्धा देशप्रेमाने झपाटल्याने ते सैन्यदलात दाखल झाले.

ठळक मुद्देघरीच पेटीचरख्यावर तयार करतात माळ : सुताचे हार अर्पण करून वाहतात बापूंना श्रद्धांजली

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : आजपासून तब्बल १५० वर्षांपूर्वी गुजरात राज्याच्या पोरबंदर येथे जन्मलेल्या महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झालेले आरमोरी येथील विठ्ठलराव काशिनाथ गुुड्डेवार हे अद्यापही गांधी विचार कायम ठेवले आहे. महात्मा गांधी जयंती व पुण्यतिथीच्या दिवशी गुड्डेवार हे स्वत:च आपल्या पेटी चरख्यावर सुतापासून हार तयार करतात. सदर सुताचे हार अर्पण करून श्रद्धांजली वाहतात. एकूणच गुड्डेवार यांचे अनोखे गांधी प्रेम अद्यापही कायम आहे.विठ्ठलराव हे बालपणीच महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झाले. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचे गांधी प्रेम अजूनही तितकेच कायम आहे. आरमोरीत १९३५ साली जन्मलेल्या विठ्ठलराव यांचे मातृछत्र बालपणीच हरपले. त्यात वडीलसुद्धा देशप्रेमाने झपाटल्याने ते सैन्यदलात दाखल झाले. परिणामी मोठ्या वडिलाने विठ्ठलरावांचे पालनपोषण केले. भारत स्वतंत्र होईपर्यंत विठ्ठलरावांचे बालपण पारतंत्र्यात गेले. विठ्ठलरावांच्या घरचे व आजूबाजूचे वातावरण भारत देशाप्रती अभिमान बाळगणारे होते. १९४२ चे ‘चले जाव आंदोलन’ व देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांचे व्यक्तीमत्व सर्वात केंद्रस्थानी होते. अशा या व्यक्तीमत्वांचे विचार चौफेर घुमू लागले. दरम्यान गांधी विचारांच्या फेऱ्यात विठ्ठलराव कसेकाय सापडले, जे आजही त्यातून बाहेर पडू शकले नाही. भविष्यात सुद्धा असेच गांधी प्रेम कायम राहणार, असा दुर्धम्य आशावाद विठ्ठलराव आपल्या बोलणातून व्यक्त करतात. विठ्ठलराव हे आजही गांधी विचाराने जीवन जगत आहेत. गांधीविषयी असलेला त्यांचा लढा व स्नेह इतरांना प्रेरणा देणारा असाच आहे.स्वच्छतेसह गांधींचे अनेक विचार आत्मसातविठ्ठलराव गुड्डेवार हे महात्मा गांधी यांना एक विचार मानतात. महात्मा गांधी यांची सर्वधर्म समभाव जपणारी प्रार्थना प्रत्येकाने आत्मसात करावी, असे ते आवर्जुन सांगतात. गांधीजींच्या जीवनातून प्रेरणा म्हणून विठ्ठलराव हे आजही खादी वस्त्र वापरतात. चरखा, खादी व गांधी यांचे अतुट समिकरण तयार झाले आहे. खादी म्हणजे सादे वस्त्र नाही तर ते सुद्धा एक विचार असल्याचे विठ्ठलराव सांगतात. साधी राहणी, मांस व्यर्ज व स्वच्छता हे तीन सुत्र विठ्ठलराव कायमपणे जपत आहेत.