शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

६० हजार विद्यार्थ्यांना यावर्षी मिळेल गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:02 IST

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला जाते. यावर्षी ६० हजार ५६१ विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देतीन कोटींचा निधी उपलब्ध : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला जाते. यावर्षी ६० हजार ५६१ विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत दरवर्षी दोन गणवेश उपलब्ध करून दिले जातात. सदर गणवेशाचा लाभ अनुसूचित जाती, जमाती, बीपीएलमध्ये मोडणाऱ्या सर्व मुलामुलींना दिला जातो. तर इतर संवर्गातील केवळ मुलींनाच गणवेश उपलब्ध करून दिले जाते. दोन वर्षांपूर्वी गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा केली जात होती. मागील वर्षीपासून राज्य शासनाने थेट लाभ हस्तांतरण करून सुरू केली आहे. मागील वर्षी संबंधित विद्यार्थ्यांचे व त्याच्या आईचे संयुक्त खाते उघडावयास लावण्यात आले होते. पालकाने गणवेश खरेदी केल्याचे बिल मुख्याध्यापकांना सादर केल्यानंतर गणवेशाची रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत होती. मागील वर्षी पहिल्यांदाच अशा प्रकारची प्रक्रिया राबविण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते नसल्याने गणवेशाची रक्कम जमा होण्यास अडचण येत होती. सत्र संपूनही दुर्गम भागातील काही विद्यार्थ्यांनी बँक खाते उघडले नाही. त्यामुळे गणवेशाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले होते. सदर योजना पारदर्शी असली तरी ज्या विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यास अडचण आली होती, असे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिल्याने या योजनेवर पालक व शिक्षकांनी टिका सुध्दा केली होती. मागील वर्षीपर्यंत विद्यार्थ्याला प्रती गणवेश ४०० रूपये दिले जात होते. यावर्षी गणवेशाच्या रकमेत वाढ केली आहे. प्रती गणवेश ६०० रूपये दिले जाणार आहे. वाढलेली महागाई लक्षात घेऊन विद्यार्थ्याला चांगला गणवेश खरेदी करता यावा, या उद्देशाने गणवेशाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.थोड्याफार विद्यार्थ्यांसाठी भेदभावसर्व शिक्षा अभियान अंतर्गत केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएल लाभार्थ्यांच्या सर्व मुलामुलींना गणवेश दिले जातात. त्याचबरोबर सर्व मुलींनाही गणवेश दिले जाते. मात्र इतर मागासवर्गीय, खुला प्रवर्ग तसेच व्हीजे, एनटी, एसबीसी प्रवर्गातील पाल्यांच्या मुलांना याचा लाभ दिला जात नाही. जवळपास ८० टक्के मुलांना गणवेश दिले जाते. केवळ २० टक्के विद्यार्थी वंचित राहतात. त्यांना आपल्याबाबत भेदभाव होत असल्याची जाणीव निर्माण होते. त्यामुळे त्यांनाही गणवेश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.पालकाच्या खात्यात जमा होणार रक्कममागील वर्षी गणवेशाची रक्कम केवळ विद्यार्थी व त्याच्या आईच्या संयुक्त खात्यात जमा होत होती. यासाठी स्वतंत्र नवीन खाते काढावे लागत होते. गडचिरोली जिल्ह्यात केवळ तालुकास्थळीच राष्ट्रीयकृत बँका आहेत. तालुकास्थळाचे गावापासून अंतर ५० ते ६० किमी आहे. बँकेत गेल्यानंतर एका दिवशी कधीच काम होत नव्हते. काही पालकांचे हजारो रूपये खर्च होऊन बँक खाते निघाले नाही. शेवटी पालकांनी बँक खाते उघडले नाही. त्यामुळे गणवेशाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. या पध्दतीमुळे मागील वर्षी हजारो विद्यार्थी गणवेशाच्या रकमेपासून वंचित राहिले होते. मागील वर्षीचा कटू अनुभव लक्षात घेऊन यावर्षी सर्व शिक्षा अभियानने थोडी शिथीलता देत पालकाचे खाते असल्यास त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.