शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

निकृष्ट दर्जाचे खत जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:14 IST

शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलत कमी दर्जाच्या खताची विक्री करणाºया पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक खतसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवारी सायंकाळी चिचोली गावात करण्यात आली.

ठळक मुद्देपाच आरोपींना अटक : ट्रकच्या सहाय्याने गावात केली जात होती विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलत कमी दर्जाच्या खताची विक्री करणाºया पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक खतसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवारी सायंकाळी चिचोली गावात करण्यात आली.नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील अ‍ॅग्रोसिल बायोटेक कंपनीचे सुपर सिलिका नावाचे खत धानोरा तालुक्यातील चिचोली येथे विक्री केले जात होते. कमी किमतीत खताची विक्री केली जात होती. कमी किमतीत खत मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी खताची खरेदी केली. मात्र काही नागरिकांना खताच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली. याबाबतची माहिती धानोरा पोलीस व कृषी विभागाच्या अधिकाºयांना देण्यात आली. खत निरीक्षक कृष्णदास दोनाडकर यांनी घटनास्थळ गाठून खताच्या दर्जाची पाहणी केली. खत संशयास्पद आढळले. इन्व्हाईस चालन तपासले असता, सुपर सिलिका कंपनीचे ३६० बॅग व सुपर ग्रो कंपनीच्या १५० बॅगची नोंद होती. ट्रकमधील संपूर्ण खताची विक्री झाली होती. पीकअप वाहनामध्ये सुपर सिलिका खताच्या ३७ ते सुपर ग्रोच्या सात बॅग आढळून आल्या. सुपर सिलिका खताची किंमत प्रती बॅग ६५० रुपये व सुपर ग्रो खताची प्रती बॅग किंमत ८५० रुपये आहे. जप्त केलेल्या सुपर सिलिका खताची किंमत २४ हजार ५० व सुपर ग्रोची किंमत ५ हजार ९५० रुपये असा एकूण ३० हजार रुपयांचा खतसाठा जप्त केला. तसेच ट्रक व पीकअप वाहन सुद्धा जप्त केले.याप्रकरणी मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील राकेश वासुदेव गेडाम (२८), चंद्रपूर तालुक्यातील पिपरी येथील विवेक उत्तम निमरड (२४), चिमूर तालुक्यातील प्रल्हांद पांडुरंग भेंडारे (४४), धानोरा तालुक्यातील पवनी येथील संजय बारिकराव गावडे (२९), वरोरा येथील सुरेंद्र तुकाराम ढोकणे (३८) यांना अटक केली आहे.या आरोपींविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंके, पोलीस उपनिरीक्षक हिंमतराव सरगर, पोलीस शिपाई अमोल कोराम, रोशन केळझरकर, प्रकाश कृपाकर, कृषी विभागाचे खत निरीक्षक कृष्णदास दोनाडकर, मंडळ कृषी अधिकारी एल.एस.पाठक, कृषी पर्यवेक्षक एन.जी.बडवाईक यांनी केली.खताचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. नमून्यांचा अहवाल आल्यानंतरच खताचा नेमका दर्जा कळण्यास मदत होईल.