शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

सौंदर्यात भर टाकणाऱ्या फवाऱ्याला अस्वच्छता, अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ आणि एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज शहरात नेहमीच लोकांची वर्दळ राहते. येथील मुख्य ...

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ आणि एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज शहरात नेहमीच लोकांची वर्दळ राहते. येथील मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करत काही वर्षांपूर्वी चौकाच्या मध्यभागी फवारा (कारंजे) लावण्यात आला. पण सद्यस्थितीत या चौकाचे सौंदर्यीकरण लोप पावले असून अस्वच्छता आणि अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. हा विळखा कधी सुटणार, असा प्रश्न देसाईगंजवासीय करत आहेत.

या नगर परिषदेचे वार्षिक बजेट कोट्यवधी रुपयांचे आहे. या अंतर्गत लाखो रुपये खर्च करून शहराच्या मुख्य चौकात फवारा लावून सौंदर्यात भर घातली होती. यासाठी जुन्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर मोटारपंप बसवून सुशोभीकरण करण्यासाठी रंगीबेरंगी लाईटही लावले होते. मात्र, तो फवारा काही दिवस चालून बंद पडला. त्याकडे आता लक्ष देण्यासाठी कोणीही तयार नाही.

शहरात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात शासकीय बांधकामे, विद्युतीकरण करण्यावर भर दिला जात असला तरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या चौकाला गतवैभव प्राप्त करून देणेही गरजेचे आहे. तसेच अतिक्रमणामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविणेही महत्त्वाचे आहे.

(बॉक्स)

लाखोंचा खर्च पाण्यात

या चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेने त्याकाळी लाखो रुपये खर्च केले होते. पण, आता किरकोळ दुकानदारांनी सभोवताली दुकाने थाटून चौकच गिळंकृत केला आहे. दुकानातून निघणारा टाकाऊ कचरा दररोज त्या चौकातच पडून राहतो. त्यामुळे या चौकाचे सौंदर्यीकरण लोप पावले असून लाखो रुपयांचा खर्चही वाया गेला आहे.

230721\04380145img_20210213_122938.jpg

शहरातील मध्यवर्ती भागातील फवारा चौक बंद चहूबाजूला अतिक्रमण