शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

सौंदर्यात भर टाकणाऱ्या फवाऱ्याला अस्वच्छता, अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ आणि एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज शहरात नेहमीच लोकांची वर्दळ राहते. येथील मुख्य ...

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ आणि एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज शहरात नेहमीच लोकांची वर्दळ राहते. येथील मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण करत काही वर्षांपूर्वी चौकाच्या मध्यभागी फवारा (कारंजे) लावण्यात आला, पण सद्य:स्थितीत या चौकाचे सौंदर्यीकरण लोप पावले असून अस्वच्छता आणि अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. हा विळखा कधी सुटणार, असा प्रश्न देसाईगंजवासीय करत आहेत.

या नगरपरिषदेचे वार्षिक बजेट कोट्यवधी रुपयांचे आहे. या अंतर्गत लाखो रुपये खर्च करून शहराच्या मुख्य चौकात फवारा लावून सौंदर्यात भर घातली होती. यासाठी जुन्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर मोटारपंप बसवून सुशोभीकरण करण्यासाठी रंगीबिरंगी लाईटही लावले होते. मात्र, तो फवारा काही दिवस चालून बंद पडला. त्याकडे आता लक्ष देण्यासाठी कोणीही तयार नाही.

शहरात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात शासकीय बांधकामे, विद्युतीकरण करण्यावर भर दिला जात असला तरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या चौकाला गतवैभव प्राप्त करून देणेही गरजेचे आहे, तसेच अतिक्रमणामुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविणेही महत्त्वाचे आहे.

(बॉक्स)

लाखोंचा खर्च पाण्यात

या चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेने त्याकाळी लाखो रुपये खर्च केले होते, पण आता किरकोळ दुकानदारांनी सभोवताली दुकाने थाटून चौकच गिळंकृत केला आहे. दुकानातून निघणारा टाकाऊ कचरा दररोज त्या चौकातच पडून राहातो. त्यामुळे या चौकाचे सौंदर्यीकरण लोप पावले असून लाखो रुपयांचा खर्चही वाया गेला आहे.

230721\0145img_20210213_122938.jpg

शहरातील मध्यवर्ती भागातील फवारा चौक बंद चहूबाजूला अतिक्रमण