शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

दुष्काळ जाहीर करताना काही गावांवर अन्याय

By admin | Updated: November 13, 2015 01:29 IST

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना तालुका घटक न मानता गाव हा घटक ठेवून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली.

शेतकऱ्यांची मागणी : ५० पैशापेक्षा अधिक पैसेवारी असलेल्या गावांना सवलती द्यावैरागड : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना तालुका घटक न मानता गाव हा घटक ठेवून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. त्यामुळे परंपरागत परिस्थितीने पैसेवारी काढताना काही गावांवर अन्याय झाला. ज्या गावाची आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. अशाही गावांना कमी प्रमाणात का होईना सोयी- सवलती द्याव्या, अशी मागणी वैरागड परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. दुष्काळ जाहीर करताना प्रत्येक गावांची स्थिती वेगळी असल्याने ज्या गावांची पैसेवारी कमी आहे त्यांना मदत केलीच पाहिजे. परंतु आज ज्यांची पिके उभी आहेत. त्यांनी कोणत्या परिस्थिती पिके उभी केलीत याचाही विचार होणे गरजेचे आहे. पाण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना अनेक शेतकऱ्यांनी एक ते दोन किलोमिटर अंतरावरून सिंचनाची सोय उलपब्ध करून पिकांना पाणी दिले व कसेबसे आपले पीक वाचविले. सिंचनाची सोय करताना भरपूर पैसा खर्च झाला. हा खर्च उत्पादन खर्चापेक्षा सिंचन सोयी व कीटकनाशकांवर अधिक झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कसेबसे धान पीक वाचविले. अशा शेतकऱ्यांनाही सोयी- सुविधा मिळणे गरजेचे आहे. ५० हून अधिक आणेवारी असणाऱ्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक पावसाअभावी नष्ट झाले. त्यामुळे या गावांतील अशा शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांमुळे वंचित राहण्याची वेळ आली आहे. रोजगार हमी योजनेतून विविध कामे मंजूर करून वन, कृषी विभाग व ग्रा. पं. स्तरावर कामे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करताना गाव हा घटक गृहित धरला असला तरी ५० टक्केच्यावर पैसेवारी असणाऱ्या गावांना या वर्षात पाणी टंचाई व चारा टंचाईची झळ पोहोचणार आहे. त्यामुळे शासनाने अशाही गावांची दखल घ्यावी.- मनोहर बावनकर, शेतकरी, वैरागडया वर्षात दमट हवामानामुळे धान पिकावर प्रचंड रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे रोगांचा बंदोबस्त करताना शेतकऱ्यांचा बराच पैसा खर्च झाला. पैसा खर्च करूनही रोग आटोक्यात आला नाही. परिणामी शेतकरी हतबल झाला. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना मदत करावी.- महेंद्र तावेडे, शेतकरी, वैरागड.रबी हंगामही बुडालाअत्यल्प पावसामुळे जमिनीतील ओलावा नष्ट झाल्याने यंदाचा रबी हंगामही बुडाला आहे. दरवर्षी शेतकरी उडीद, मूग, हरभरा, जवस, मसूर, ज्वारी, गहू यासह अनेक कडधान्य पिकाचे उत्पादन घेत होते. परंतु रबी हंगामासाठी आवश्यक असणारा ओलावा जमिनीत नसल्याने रबी हंगाम बुडाला आहे.