शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
4
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
5
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
6
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
7
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
8
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
9
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
10
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
11
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
12
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
13
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
14
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
15
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
16
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
17
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
18
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
19
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
20
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ

विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाजनिर्मिती अशक्य

By admin | Updated: April 9, 2015 01:33 IST

सर्व स्तरातील सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाज निर्माण होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

गडचिरोली : सर्व स्तरातील सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाज निर्माण होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तळागाळातील लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचणार नाही, तोपर्यंत सामाजिक समता निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर बुधवारपासून सामाजिक समता सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन सामाजिक न्याय भवनात त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सहाय्यक समाजकल्याण आयुक्त विनोद मोहतुरे, समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, उपपोलीस अधीक्षक (गृह) बी. डी. इलमकर, प्राचार्य अल्लमवार, कृषी अधिकारी कापसे आदी उपस्थित होते.समता सप्ताहाचे आयोजन तळागाळातील लाभार्थ्यांना योजना पोहोचविण्याचा उपक्रम असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, विशेष करून युवकांना ग्रंथालयाशी जोडून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी योजना तयार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले. यावेळी समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, कृषी अधिकारी कापसे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समाजकल्याण निरीक्षक संदीप खोबरखेडे, सहाय्यक लेखाधिकारी समीर देशमुख, सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध महामंडळाचे व्यवस्थापक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे तर आभार सारंग गावंडे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)