शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाजनिर्मिती अशक्य

By admin | Updated: April 9, 2015 01:33 IST

सर्व स्तरातील सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाज निर्माण होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

गडचिरोली : सर्व स्तरातील सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाज निर्माण होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तळागाळातील लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचणार नाही, तोपर्यंत सामाजिक समता निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर बुधवारपासून सामाजिक समता सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन सामाजिक न्याय भवनात त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सहाय्यक समाजकल्याण आयुक्त विनोद मोहतुरे, समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, उपपोलीस अधीक्षक (गृह) बी. डी. इलमकर, प्राचार्य अल्लमवार, कृषी अधिकारी कापसे आदी उपस्थित होते.समता सप्ताहाचे आयोजन तळागाळातील लाभार्थ्यांना योजना पोहोचविण्याचा उपक्रम असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, विशेष करून युवकांना ग्रंथालयाशी जोडून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी योजना तयार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले. यावेळी समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, कृषी अधिकारी कापसे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समाजकल्याण निरीक्षक संदीप खोबरखेडे, सहाय्यक लेखाधिकारी समीर देशमुख, सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध महामंडळाचे व्यवस्थापक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे तर आभार सारंग गावंडे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)