शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाजनिर्मिती अशक्य

By admin | Updated: April 9, 2015 01:33 IST

सर्व स्तरातील सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाज निर्माण होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

गडचिरोली : सर्व स्तरातील सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाज निर्माण होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तळागाळातील लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचणार नाही, तोपर्यंत सामाजिक समता निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर बुधवारपासून सामाजिक समता सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन सामाजिक न्याय भवनात त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सहाय्यक समाजकल्याण आयुक्त विनोद मोहतुरे, समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, उपपोलीस अधीक्षक (गृह) बी. डी. इलमकर, प्राचार्य अल्लमवार, कृषी अधिकारी कापसे आदी उपस्थित होते.समता सप्ताहाचे आयोजन तळागाळातील लाभार्थ्यांना योजना पोहोचविण्याचा उपक्रम असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, विशेष करून युवकांना ग्रंथालयाशी जोडून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी योजना तयार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले. यावेळी समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, कृषी अधिकारी कापसे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समाजकल्याण निरीक्षक संदीप खोबरखेडे, सहाय्यक लेखाधिकारी समीर देशमुख, सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध महामंडळाचे व्यवस्थापक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे तर आभार सारंग गावंडे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)