शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

अनधिकृत २२२ घरांना संरक्षण

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

प्लॉट अकृषक न करताच तसेच नगर परिषदेची परवानगी न घेताच ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

गडचिरोली शहरातील स्थिती : ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची घरे होणार नियमितगडचिरोली : प्लॉट अकृषक न करताच तसेच नगर परिषदेची परवानगी न घेताच ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याचा लाभ गडचिरोली शहरातील २२२ घरांना मिळणार आहे. नगर परिषद क्षेत्रात घर बांधायचे असल्यास ज्या ठिकाणी घर बांधले जाते. सदर जागा अकृषक करून त्याचे प्लॉट पाडणे आवश्यक आहे. मात्र अकृषक करताना बांधकाम विभागाचे सर्वच नियम पाळावे लागतात. नाली बांधकाम, रस्ता, ओपन स्पेस सोडावी लागते. यामध्ये बरीच जागा जात असल्याने प्लॉटची संख्या कमी होते. त्यामुळे काही प्लॉटधारक अकृषक न करताच प्लॉटची विक्री करतात. अकृषक न झालेले प्लॉट तुलनेने स्वस्त पडतात. त्याचबरोबर नगर परिषदेची परवानगी घेण्यासाठी येणारा ४० ते ५० हजार रूपयांचा खर्चही वाचतो. त्यामुळे अकृषक न झालेले प्लॉट घेण्याकडे नागरिकांचा सर्वाधिक ओढा राहते. गडचिरोली शहरात सद्य:स्थितीत २२२ घरांचे बांधकाम अकृषक न करताच झाले असल्याची नोंद नगर परिषदेकडे आहे. नगर परिषदेच्या दृष्टीने सदर बांधकाम अवैध आहे. नगर परिषद प्रशासन घर मालकाला याबाबत नोटीस पाठविते. मात्र कोणतीही कारवाई करू शकत नसल्याने ही घरे बिनधास्तपणे शहरात उभी आहेत. राज्य शासनाने आठ दिवसांपूर्वी निर्णय घेऊन ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी ज्या घरांचे बांधकाम झाले आहे. या घरांवर योग्य तो शुल्क आकारून नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांना संरक्षण प्राप्त झाले आहे. नगर परिषद मात्र या बांधकामांना अधिकृत करताना घर बांधणीचा शुल्क वसूल करणार आहे. घरांची संख्या ५०० पेक्षा अधिकप्लॉट अकृषक असल्याने नगर परिषदेची परवानगी न घेताच बांधलेल्या घरांची संख्या केवळ २२२ असल्याची नोंद नगर परिषदेकडे आहे. मात्र प्रत्यक्षात घरांची संख्या ५०० पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. नगर परिषदेच्या मार्फतीने दरवर्षी अवैध घरांच्या बांधकामाबाबत मोहीम उघडून सर्वे करणे आवश्यक आहे. मात्र दरवर्षी सर्वे करण्यात येत नाही. ज्या कर्मचाऱ्यांवर अवैध बांधकामाच्या सर्वेची जबाबदारी आहे. ते कर्मचारी घर बसल्याच अहवाल सादर करतात. त्यामुळे घरांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.सुविधा मिळाल्याने परवानगीकडे दुर्लक्षअतिक्रमित जागेत, अकृषक न करताच घरे बांधणे कायद्याने चुकीचे आहे. मात्र नगर परिषद अशा घरांना एका वर्षात वीज, पाणी पुरवठा, रस्ता, नाली आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे या क्षेत्रात घर बांधणाऱ्या नागरिकांचे कोणतेच काम अडत नाही. परिणामी जास्त किमतीचा अकृषक प्लॉट घेऊन नगर परिषदेकडे परवानगीसाठी ३० ते ५० हजार रूपयांचा शुल्क भरण्यास घरमालक तयार होत नाही व नगर परिषदेच्या नोटीसलाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.