शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

अखेर अहेरीत जळाऊ बिट व बांबू उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:11 IST

अहेरी शहर व परिसरातील गावांमध्ये अंत्यविधीसाठी जळावू लाकुड बिट व बांबू उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. अंत्यविधीसाठी ५ते ६ हजार रुपये खर्च करून जळाऊ लाकूड बाहेरून विकत घ्यावे लागत होते. यामुळे नागरिकांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहेरी येथे जळाऊ लाकुड बिट व बांबू उपलब्ध करून दिले.

ठळक मुद्देपाठपुराव्याला यश : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी शहर व परिसरातील गावांमध्ये अंत्यविधीसाठी जळावू लाकुड बिट व बांबू उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. अंत्यविधीसाठी ५ते ६ हजार रुपये खर्च करून जळाऊ लाकूड बाहेरून विकत घ्यावे लागत होते. यामुळे नागरिकांना जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहेरी येथे जळाऊ लाकुड बिट व बांबू उपलब्ध करून दिले.नागरिकांकडून वनविभाग आलापल्लीकडे अहेरी येथे जळावू लाकुड बिट व बांबू उपलब्ध करून देण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे वनविभागातर्फे दुर्लक्ष केले जात होते. याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी ही समस्या पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिली. विषयाची गांभिर्याने दखल घेत पालकमंत्री आत्राम यांनी आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक तांबे व अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी चौहान यांना पाचारण करून नागरिकांची भावना लक्षात घेऊन व त्यांचे आर्थिक भुर्दंड कमी व्हावा यासाठी २ दिवसात अहेरी येते जडावू लाकूड व बांबू शासकीय दरात उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांना दिले. त्यांनतर लगेच २४ तासातच अहेरी येतील पॉवर हाऊस कॉलनी येथील वन विभागाच्या कार्यालयात जळावू बिट व बांबू वन विभागातर्फे सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासकीय दरानुसार, अंत्यविधीसाठी फक्त ४०० रुपयांत जळावू बिट व बांबू अहेरी शहरात उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठी सोय झाली आहे, मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी आत्ता पूर्ण झाल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.त्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे आभार मानत समाधन व्यक्त केले आहे.