शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दोन हजारांच्या नोटने ग्राहक त्रस्त

By admin | Updated: January 11, 2017 02:13 IST

८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. या घटनेला आता जवळपास दोन महिने झाले.

खातेदारांची अडचण वाढली : जिमलगट्टा भागात एकालाही मिळाले नाही २४ हजार रुपये जिमलगट्टा : ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. या घटनेला आता जवळपास दोन महिने झाले. ६० दिवसानंतरही जिमलगट्टा येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेमधून दोन हजारापेक्षा अधिक रक्कम नागरिकांना मिळत नसल्याने नागरिक व खातेदार अडचणीत सापडले आहे. रिझर्व बँकेच्या धोरणानुसार प्रत्येक खातेदाराला आठवड्यातून किमान २४ हजार रूपये मिळायला पाहिजे, परंतु या शाखेतून अजूनपर्यंत एकाही खातेदाराला २४ हजार रूपये मिळालेले नाही. रोज दोन हजार रूपये दिले तरी आठवड्यातील सात दिवसात केवळ एका ग्राहकास १४ हजार रूपये रक्कम काढता येऊ शकते, यासाठी आठवडाभर बँकेत यावे लागते. नोटबंदीच्या ५० दिवसानंतर ३० डिसेंबरला नागरिकांना दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु जिमलगट्टा या दुर्गम परिसरात अजूनही नागरिकांना स्वत:च्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. जिमलगट्टा येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नाही. केवळ सहकारी बँकेची शाखा असून नोटबंदीच्या दोन महिन्यानंतरही ५०० रूपयांची चलनी नोट ग्राहकापर्यंत पोहोचलेली नाही. बँकेतून केवळ दोन हजार रूपयांचीच एक नोट दिली जात आहे, बाजारात चिल्लरचा तुटवडा आहे. रिझर्व बँकेचे आदेश असतानाही ग्रामीण भागातील परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. १०० व ५०० चे चलन मिळत नसल्याने स्वत:ची रक्कम बँकेतून काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. देचलीपेठा, उमानूर, कमलापूर भागातील जनतेला २० किमी अंतरावर जिमलगट्टा येथे येऊन बँकेचे काम करून घ्यावे लागत आहे. बँकेत रक्कम संपल्यास अनेकदा रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत.