शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी दोन हजार किमीची पेट्रोलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:22 IST

झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर कोसळून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अधिक घडतात. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना महावितरणने वीज तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यावर विशेष भर दिला आहे.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व नियोजन : अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे प्रयत्न; गंजलेले वीज खांब बदलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर कोसळून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अधिक घडतात. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना महावितरणने वीज तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यावर विशेष भर दिला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आलापल्ली व गडचिरोली विभागातील सुमारे २ हजार १९० किलोमीटर अंतर पेट्रोलिंग करून वीज तारांवर लोंबकळत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. मात्र तरीही तांत्रिक बिघाडामुळे वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार वाढल्यामुळे वीज ग्राहकांची ओरड सुरू झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश वीज तारा जंगलातून गेल्या आहेत. काही ठिकाणी अगदी झाडाला रेटून वीज लाईन टाकण्यात आली आहे. वाढणाºया झाडाच्या फांद्या वीज तारांपर्यंत पोहोचतात. पावसाळ्यात वादळ आल्यानंतर झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करतात. त्यामुळे झाडांमध्ये विद्युत प्रवाह सुरू होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता राहते. झाडाच्या फांद्यांमुळे दोन वीज तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्यास स्पार्र्किंग होऊन वीज पुरवठा खंडीत होतो. गडचिरोली जिल्ह्यात झाडांमुळेच वीज पुरवठा खंडीत होण्याचे सर्वाधिक प्रकार घडतात.महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही पावसाळ्याच्या दिवसात बरीच धावपळ करावी लागते. यामुळे महावितरण मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यावर सर्वाधिक भर देत असल्याचे दिसून येते. मागील वर्षभरात वीज कर्मचाºयांनी गडचिरोली विभागात १ हजार ४६० किलोमीटर तर आलापल्ली विभागात ७३० किमीची पेट्रोलिंग करून वीज तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर हे काम अधिक गतीने आणि ईमानदारीने होणे अपेक्षित असते. परंतू थोड्या वादळातही वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे हे काम योग्यप्रकारे झाली नाही की काय, अशी शंका वीज ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.मुख्यालय सोडल्यास कारवाईगडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात विजेमुळे अनेक दुर्घटना घडतात. बहुतांश वीज लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे पाऊस किंवा वादळ आल्यानंतर वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुध्दा वाढतात. वीज उपकरणांमधील बिघाड वेळीच दुरूस्त व्हावा, यासाठी प्रत्येक वीज कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहून सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणने वरिष्ठ अधिकाºयांना दिले आहेत.४०० इन्सुलेटर बदलविलेएका खांबावरून दुसºया वीज खांबावर वीज तारा नेताना इन्सुलेटर हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. पावसाळ्यामध्ये इन्सुलेटर तुटण्याच्या घटना अधिक घडतात. इन्सुलेटर तुटल्यास वीज पुरवठा खंडीत होतो. वीज पुरवठा खंडीत न झाल्यास वीज तारांना वीज पुरवठा सुरू राहून तो खांबापर्यंत पोहोचून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने तुटण्याच्या स्थितीत असलेले २५० पिन इन्सुलेटर व १३६ डिस्क इन्सुलेटर बदलविले आहेत. ६९ ट्रान्सफार्मरचे आॅईल बदलविण्यात आले आहे. १५ ठिकाणचे डीटीसी केबल, १०५ क्षतिग्रस्त झालेले खांब बदलविण्यात आले आहेत. तसेच ९६ ठिकाणच्या वीज तारा ओढण्यात आल्या आहेत.वीज तारा तुटल्या असल्यास नागरिकांनी त्या तारांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये. तुटलेल्या तारांची माहिती महावितरणला द्यावी. एखाद्या झाडावरून वीज तारा गेल्या असल्यास झाडात विद्युत प्रवाह येऊन दुर्घटना घडण्याची शक्यता राहते. त्यामुळे अशा झाडाची माहिती महावितरणला द्यावी. प्रत्येक वीज ग्राहकाचा फोन स्वीकारून लाईट ब्रेकडाऊन झाली असल्यास ती तत्काळ दुरूस्त करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या आहेत.- विजय मेश्राम,कार्यकारी अभियंता,महावितरण गडचिरोली